शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पाणीटंचाईने होरपळतो आहे मोखाडा तालुका

By admin | Updated: March 29, 2016 03:02 IST

संपुर्ण तालुका पाणीटंचाईने होरपळत असून भीषण पाणीटंचाईचे संकट मोखाडावासिंयाना समोर येऊन ठाकले आहे. जानेवारी महिना संपताच आदीवासी बापडे घोटभर पाण्यासाठी वणवण

- रवींद्र साळवे,  मोखाडा

संपुर्ण तालुका पाणीटंचाईने होरपळत असून भीषण पाणीटंचाईचे संकट मोखाडावासिंयाना समोर येऊन ठाकले आहे. जानेवारी महिना संपताच आदीवासी बापडे घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करायला सुरुवात करतात. यामुळे पुढे येणाऱ्या एप्रिल - मे महिन्यात या भीषण पाणीटंचाईला कसे सामोरे जायच असा प्रश्न आदिवासी समोर निर्माण झाला आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना एक महिन्याच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर प्रशासनाने १७ गावपाड्यांसाठी सात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील किनिस्ते, ठाकुरपाडा, लोहारपाडा, दुधगाव, बनाचीवाडी, ठोळपाडा, जांभळीचापाडा, घोसाळी, राजीव नगर, निळमाती यांच्यासह पंधरा पेक्षा अधिक गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. परतु अद्यापही तरी या गावपाडयाना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही यामुळे कुणी टँकर देता का टँकर अशी म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले असल्याचे सांगितले. परंतु अजून पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. कायदा काय म्हणतो... टंचाईग्रस्त गावपाड्यांची मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पहाणी करुन २४ तासाच्या आत पाणी पुरवठा करणे बंधनकारक आहे. तसेच गेल्या वर्षी टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदाराना दिले होते. तसेच टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना असताना पाणी टंचाईनेचे प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे परंतु तरी देखिल अजुनही टँकरने पाणीपुरवठा झालेला नाही.

१७ गावपाड्यासाठी सात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे व टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावपाड्याचे प्रस्ताव मंजूरसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले आहेत. लवकरच या गावपाड्याना टँंकरने पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच टँँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार वरिष्ठाकडून प्राप्त झालेले नाही. - जयराज सूर्यवंशी, तहसीलदार,

मोखाडा निळमाती गावातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन ते तीन कि मी अंतरावरून महिला पुरुषांना पाणी आणावे लागते. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदाकडे करुन पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्याप पर्यत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे बंधाऱ्यातील दुषित पाणी प्यावे लागत आहे. - चंदर मधुकर दळवी, ग्रामस्थ निळमाती