शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाणीटंचाईने होरपळतो आहे मोखाडा तालुका

By admin | Updated: March 29, 2016 03:02 IST

संपुर्ण तालुका पाणीटंचाईने होरपळत असून भीषण पाणीटंचाईचे संकट मोखाडावासिंयाना समोर येऊन ठाकले आहे. जानेवारी महिना संपताच आदीवासी बापडे घोटभर पाण्यासाठी वणवण

- रवींद्र साळवे,  मोखाडा

संपुर्ण तालुका पाणीटंचाईने होरपळत असून भीषण पाणीटंचाईचे संकट मोखाडावासिंयाना समोर येऊन ठाकले आहे. जानेवारी महिना संपताच आदीवासी बापडे घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करायला सुरुवात करतात. यामुळे पुढे येणाऱ्या एप्रिल - मे महिन्यात या भीषण पाणीटंचाईला कसे सामोरे जायच असा प्रश्न आदिवासी समोर निर्माण झाला आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना एक महिन्याच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर प्रशासनाने १७ गावपाड्यांसाठी सात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील किनिस्ते, ठाकुरपाडा, लोहारपाडा, दुधगाव, बनाचीवाडी, ठोळपाडा, जांभळीचापाडा, घोसाळी, राजीव नगर, निळमाती यांच्यासह पंधरा पेक्षा अधिक गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. परतु अद्यापही तरी या गावपाडयाना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही यामुळे कुणी टँकर देता का टँकर अशी म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले असल्याचे सांगितले. परंतु अजून पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. कायदा काय म्हणतो... टंचाईग्रस्त गावपाड्यांची मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पहाणी करुन २४ तासाच्या आत पाणी पुरवठा करणे बंधनकारक आहे. तसेच गेल्या वर्षी टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदाराना दिले होते. तसेच टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना असताना पाणी टंचाईनेचे प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे परंतु तरी देखिल अजुनही टँकरने पाणीपुरवठा झालेला नाही.

१७ गावपाड्यासाठी सात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे व टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावपाड्याचे प्रस्ताव मंजूरसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले आहेत. लवकरच या गावपाड्याना टँंकरने पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच टँँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार वरिष्ठाकडून प्राप्त झालेले नाही. - जयराज सूर्यवंशी, तहसीलदार,

मोखाडा निळमाती गावातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन ते तीन कि मी अंतरावरून महिला पुरुषांना पाणी आणावे लागते. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदाकडे करुन पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्याप पर्यत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे बंधाऱ्यातील दुषित पाणी प्यावे लागत आहे. - चंदर मधुकर दळवी, ग्रामस्थ निळमाती