शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महिलांच्या आंदोलनाने मोखाडा पं. समिती ठप्प

By admin | Updated: June 15, 2016 00:51 IST

या तालुक्यात पाणी मुबलक असूनही केवळ नियोजनाच्या अभावी ते आदीवासींना मागूनही मिळत नाही. याच्या निषेधार्थ तालुक्यातील महिलांनी मंगळवारी येथील पंचायत समितीच्या कार्यालयात

मोखाडा : या तालुक्यात पाणी मुबलक असूनही केवळ नियोजनाच्या अभावी ते आदीवासींना मागूनही मिळत नाही. याच्या निषेधार्थ तालुक्यातील महिलांनी मंगळवारी येथील पंचायत समितीच्या कार्यालयात धरणे धरून तिचा कारभार ठप्प केला. पाणी मिळावे म्हणून आदिवासी महिलांनी एकत्र येऊन प्रत्येक गावात पाणी हक्क संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीतील महिलांनी आज मोखाडा पंचायत समितीच्या कार्यालयात जलपूजन आणि अधिकाऱ्यांना सुबुध्दी मिळावी यासाठी धरणे धरून काम ठप्प केले. तर त्यांनी आरंभिलेल्या भजनांच्या आणि मृदुंगांच्या आवाजाने संपूर्ण कार्यालय दणाणले होते. यावेळी महिलांनी पाण्याची मागणी करून, गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांना धारेवर धरले.मोखाडा तालुक्यात २८ ग्रामपंचायती असून ५९ गावे २२२ पाडे आहेत. यामधील ५० टक्क्याहून अधिक गाव-पाडे टंचाईने ग्रस्त आहेत. आदिवासी गाव-पाडयांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महिलांना रात्र-दिवस पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाणी टंचाईवर व टँकरने पाणी पुरवठयासाठी प्रतिवर्षी करोडो रूपये खर्च केले जातात. तसेच उपायोजनासाठी करोडो रूपयांची कामे केली जातात. मात्र, ती निकृष्ट असतात, त्याकडे अधिकारी डोळेझाक करतात. त्यामुळे शासन करोडो रूपये खर्चूनही आदिवासींच्या नशिबी पाणी टंचाई कायम राहत आहे. प्रत्येक गावात महिलांनी स्थापलेल्या पाणी हक्क संघर्ष समितीने मोखाडा गटविकास अधिकारी यांना आदिवासींना पाणी देण्याची सुबुध्दी देवो, म्हणन देवाला साकडे घालण्याचे अनोखे आंदोलन प्रभु, संगिता भोये, हिरा तुंबडा आणि साधना वैराळे यांच्या नेतृत्वाखाली केले होते. मोखाडा पंचायत समितीच्या व्हरांडयापासून ते पूर्ण कार्यालयात महिलांनी ठिय्या मांडला होता. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातून हलताच आले नाही. यावेळी महिलांनी तबल्याच्या तालावर भजने गायली. दरम्यान दुपारी १ वाजेच्या दरम्यान गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे कार्यालयात आले. त्या अगोदर गटविकास अधिकाऱ्यांच्या बंद दालनाला महिलांनी हार घालून त्याची पूजा केली. गोडांबे येताच महिलांनी प्रश्नांचा आणि समस्यांचा भडिमार सुरू केला. यावेळी सभापती सारिका निकम, देखील उपस्थित होत्या. (वार्ताहर) गढूळ पाणी पिण्याचा अधिकाऱ्यांना आग्रहआम्हाला पाणी द्या, असा घोषा लावून पाचघर-करोळच्या रणरागीणींनी गोडांबेंची भंबेरीच उडवली. यावेळी त्यांनी आम्ही कोणते व कसे? चिखल मिश्रीत पाणी पितो, ते दाखविण्यासाठी त्यांनी ते एका बाटलीत भरून आणले होते. हे पाणी या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे असा हट्ट त्यांनी धरला होता. १२ वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरूच होते. त्यामुळे कार्यालयात महिलांच्या आंदोलनाच्या दणक्याने संपुर्ण कामकाजावर परिणाम झाल्याचे स्पष्ट जाणवत होते. या अनोख्या आंदोलनाने कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी अचंबित झाले होते.आंदोलनकर्त्या महिलांनी प्रामुख्याने गाव-पाडयातील विहीरीचे रुंदीकरण, खोलीकरण तसेच नव्याने विहिरी बांधण्याची मागणी केली आहे. तसेच टंचाईग्रस्त सर्व गाव-पाडयांना नियमित टँकरव्दारे पाणी पुरविण्याच्या मागणीवर महिला ठाम राहिल्या अखेर दुपारी ३०.३० वाजता गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखे आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले.