शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पीन बोरर रोगामुळे मोगरा पिकाचे नुकसान; कृषी विभागाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:07 IST

सध्या मोठ्या प्रमाणात दररोज मोगरा कळी काढली जात आहे.

विक्रमगड :  विक्रमगड तालुक्यातील अनेक भागांमध्ये फुलशेती केली जात असून, त्यात मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तालुक्यातील खांड, ओंदे, उघाणी, वाकी, पोचाडा, साखरा, अशा ४० ते ५० गावांत शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये मोगरा लागवड केली आहे. मात्र, त्याच वेळी मोगऱ्यावर पडलेल्या पीन बोरर रोगामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. या संदर्भातील तक्रारींनंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.

सध्या मोठ्या प्रमाणात दररोज मोगरा कळी काढली जात आहे. विक्रमगडची मोगरा कळी दादर व नाशिकच्या मार्केटला जाते. सद्यस्थितीत या फुलांची मागणी जरी वाढली असली, तरी थंडी सुरू झाल्याने मोगऱ्याचे उत्पादन काही प्रमाणात घटले आहे, तसेच पीन बोरर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

मोगरा कळी तयार होण्याचा कालावधीदरम्यान मोगरा कळीमधे लहान शेंद्री अळ्या तयार होऊन पूर्ण पीक वाया जाते. ज्या शेतकऱ्यांचे ८ ते १० किलो मोगऱ्याच्या कळीचे उत्पादन व्हायचे, तिथे थंडीमुळे व रोगामुळे उत्पादन कमी झाले आहे.  या रोगाची कृषी विभागाचे कृषी संशोधन केंद्र, पालघर येथील कीड व रोग शास्त्रज्ञ ढाणे व कृषी विभागाचे आर.यू. इभाड, कृषी सहायक एच.एन. गिरासे, एस.एस. गावित, माळगावी, ए.एस. भोडवे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार