शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाच कोटींच्या रस्त्याची दोन वर्षांत दयनीय स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 01:16 IST

संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

मनोर : पाच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या मासवन-नागझरी रस्त्याची दोन वर्षात दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे खड्ड्यांतून प्रवास करताना प्रचंड हाल होत आहेत. यामुळे संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.पालघर तालुक्यातील पूर्वेला मासवन-नागझरी या ८ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी २०१६ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ५.८५ कोटी रुपये मंजूर झाले होते. हे काम २०१७ ला सुरू करण्यात आले होते, परंतु या रस्त्याचे दोन्ही बाजूचे साईट पट्टी, मोºया आणि दिशादर्शक फलक याचे कामे आजही अपूर्ण आहेत. रस्त्यासाठी वापरलेला साहित्य (मटेरियल) निकृष्ट वापरल्यामुळे दोन वर्षातच पूर्ण रस्ता उखडून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आतापर्यंत दुचाकीस्वार पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच चारचाकी वाहनांचेही अपघात घडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणारे विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध यांचे प्रचंड हाल होत आहेत. नागझरी, निहे, वंदिवली, कटाळले, लोहरे, खारसेत ही गावे या परिसरात येत असून तेथील नागरिकांनी रस्त्याच्या कामात दर्जेदार साहित्य वापरले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार संबंधित विभागाकडे करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविण्यात सहभागी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून मासवण, काटाळे, लोवरे आणि निहे ग्रा.पं.नी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

 

।गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, शालेय मुले यांना या रस्त्याने प्रवास करीत असताना अतिशय जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले नाही तर बससेवाही बंद केली जाईल. रस्ता खराब असल्याने वारंवार महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून निहे, नागझरी, लोवरे यांना निवेदने दिली जातात. रस्ता चालू केला नाही तर मासवन, पालघर मुख्य रस्त्यावर रस्ता रोको केले जाईल.- गणपत पाटील, अध्यक्ष, तंटामुक्त कमिटी लोवरे> शासकीय अधिकाऱ्यांना रस्त्याचे फोटो पाठवले व पत्रव्यवहार केला आहे. ३ ते ४ ठिकाणी मोºया बांधणे बाकी आहे. हा रस्ता लवकरात लवकर चालू केला नाही तर धरणे आंदोलन छेडले जाईल.- संजय पवार, सरपंच, मासवन ग्रामपंचायत.