शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

विकास आराखड्यातील बदलास राज्यमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:56 IST

पालघर जिल्ह्याच्या आशा पल्लवित; जनतेने सोडला सुटकेचा नि:श्वास, असंख्य त्रुटी, प्रचंड दोष पाहून मंत्रीही चकित

- हितेन नाईक पालघर : पालघर, ठाणे, रायगड प्रादेशिक आराखड्यामधील त्रुटी, दोष हे जिल्ह्यातील स्थानिकावर अन्यायकारक असून सादर केलेल्या आराखड्यात सुचिवलेल्या बाबीवर सकारात्मक विचार करून बदल न केल्यास जिल्ह्याच्या विकासाला पुढील २० वर्षांपर्यंत मोठी खीळ बसणार असल्याचे वास्तव स्थानिकांनी रायगडचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांना उदाहरणांसह दाखवून दिले.पालघर जिल्हा आर्किटेक्ट, इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र काळे, वास्तू शिल्प असोसिएट्सचे मालक निशांत पाटील, इप्सित ग्रुपचे एमडी प्रसन्न गडकरी तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष. प्रशांत पाटील,प्रदेश सचिव युवा नेते. अंकुर राऊत, युवा जिल्हा सरचिटणीस. समीर पाटील,पालघर शहर अध्यक्ष. जयेश आव्हाड, युवा अध्यक्ष हर्षद पाटील ह्यांनी १९ जून रोजी राज्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जिल्ह्यात पुढील काळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, अल्पभूधारक, बिल्डर आदींवर होणारा अन्याय चव्हाणांच्या निदर्शनास आणून दिला.प्रसिद्ध झालेल्या आराखड्यांतर्गत नकाशामध्ये अस्तित्वातील जमीन वापर नकाशे सदोष असून एन ए करण्यात आलेल्या जमिनी हरितपट्ट्यात (ग्रीन झोन) मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. पालघरचा भौगोलिक विचार न करता केलेला हा नकाशा असून जिल्ह्याच्या भविष्याचा वेध घेणारा हा आराखडा असल्याने त्याचा अभ्यासपूर्वक विचार करून संबंधित तज्ञांच्या मदतीने तो साकारणे गरजेचे असताना तसे काही झाल्याचे दिसून येत नाही. पालघर अणुशक्ती केंद्रासंदर्भात काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास जी आपत्कालीन व्यवस्था करावी लागणार आहे त्याबद्दल कोणत्याही प्रकारची उपाययोजना या आराखड्यामध्ये करण्यात आल्याचे दिसून येत नाही, आपत्कालीन व्यवस्थापन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असून ते स्वत: या प्रादेशिक योजनेच्या समितीचे उपाध्यक्ष आहेत. इतक्या गंभीर विषयाची पायमल्ली करून नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा जीवघेणा प्रकार असल्याची भावना स्थानिका मधून व्यक्त केली जात आहे. शासनाने नवीन शर्ती व इतर जमिनींना परवानग्या देतांना जमीन मालकाकडून मोठ्या रक्कमा वसूल केल्या असतांना त्या जमिनी आता ग्रीन झोनमध्ये अंतर्भूत केल्या आहेत. हा प्रकार म्हणजे दुहेरी आर्थिक लूट असल्याची संतप्त प्रतिक्रीया जिल्ह्यात उमटू लागल्या आहेत. शेतकरी-बागायतदार ह्यांना आपल्या जमिनीत शेतघर बांधण्याची परवानगी मिळणार असली तरी परवानगीसाठी मात्र जिल्हाधिकाºयाकडे जावे लागणार असून ग्रामपंचायतीना फक्त बांधकाम परवानगी देण्याइतपतच मर्यादित अधिकार राहणार असून साधे शेतघर बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या रक्कमेचा नजराणाही भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे केळवे, डहाणू, बोर्डी आदी पर्यटन ठिकाणी बांधण्यात आलेल्या बांधकामांना बेकायदेशीर ठरवून ते तोडण्याच्या नोटीसा प्रांत कार्यालयाकडून गेल्याने जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय धोक्यात येणार आहे. आदी अनेक त्रुट्या शिष्टमंडळाने राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या