शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यातील बदलास राज्यमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:56 IST

पालघर जिल्ह्याच्या आशा पल्लवित; जनतेने सोडला सुटकेचा नि:श्वास, असंख्य त्रुटी, प्रचंड दोष पाहून मंत्रीही चकित

- हितेन नाईक पालघर : पालघर, ठाणे, रायगड प्रादेशिक आराखड्यामधील त्रुटी, दोष हे जिल्ह्यातील स्थानिकावर अन्यायकारक असून सादर केलेल्या आराखड्यात सुचिवलेल्या बाबीवर सकारात्मक विचार करून बदल न केल्यास जिल्ह्याच्या विकासाला पुढील २० वर्षांपर्यंत मोठी खीळ बसणार असल्याचे वास्तव स्थानिकांनी रायगडचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांना उदाहरणांसह दाखवून दिले.पालघर जिल्हा आर्किटेक्ट, इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र काळे, वास्तू शिल्प असोसिएट्सचे मालक निशांत पाटील, इप्सित ग्रुपचे एमडी प्रसन्न गडकरी तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष. प्रशांत पाटील,प्रदेश सचिव युवा नेते. अंकुर राऊत, युवा जिल्हा सरचिटणीस. समीर पाटील,पालघर शहर अध्यक्ष. जयेश आव्हाड, युवा अध्यक्ष हर्षद पाटील ह्यांनी १९ जून रोजी राज्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जिल्ह्यात पुढील काळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, अल्पभूधारक, बिल्डर आदींवर होणारा अन्याय चव्हाणांच्या निदर्शनास आणून दिला.प्रसिद्ध झालेल्या आराखड्यांतर्गत नकाशामध्ये अस्तित्वातील जमीन वापर नकाशे सदोष असून एन ए करण्यात आलेल्या जमिनी हरितपट्ट्यात (ग्रीन झोन) मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. पालघरचा भौगोलिक विचार न करता केलेला हा नकाशा असून जिल्ह्याच्या भविष्याचा वेध घेणारा हा आराखडा असल्याने त्याचा अभ्यासपूर्वक विचार करून संबंधित तज्ञांच्या मदतीने तो साकारणे गरजेचे असताना तसे काही झाल्याचे दिसून येत नाही. पालघर अणुशक्ती केंद्रासंदर्भात काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास जी आपत्कालीन व्यवस्था करावी लागणार आहे त्याबद्दल कोणत्याही प्रकारची उपाययोजना या आराखड्यामध्ये करण्यात आल्याचे दिसून येत नाही, आपत्कालीन व्यवस्थापन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असून ते स्वत: या प्रादेशिक योजनेच्या समितीचे उपाध्यक्ष आहेत. इतक्या गंभीर विषयाची पायमल्ली करून नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा जीवघेणा प्रकार असल्याची भावना स्थानिका मधून व्यक्त केली जात आहे. शासनाने नवीन शर्ती व इतर जमिनींना परवानग्या देतांना जमीन मालकाकडून मोठ्या रक्कमा वसूल केल्या असतांना त्या जमिनी आता ग्रीन झोनमध्ये अंतर्भूत केल्या आहेत. हा प्रकार म्हणजे दुहेरी आर्थिक लूट असल्याची संतप्त प्रतिक्रीया जिल्ह्यात उमटू लागल्या आहेत. शेतकरी-बागायतदार ह्यांना आपल्या जमिनीत शेतघर बांधण्याची परवानगी मिळणार असली तरी परवानगीसाठी मात्र जिल्हाधिकाºयाकडे जावे लागणार असून ग्रामपंचायतीना फक्त बांधकाम परवानगी देण्याइतपतच मर्यादित अधिकार राहणार असून साधे शेतघर बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या रक्कमेचा नजराणाही भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे केळवे, डहाणू, बोर्डी आदी पर्यटन ठिकाणी बांधण्यात आलेल्या बांधकामांना बेकायदेशीर ठरवून ते तोडण्याच्या नोटीसा प्रांत कार्यालयाकडून गेल्याने जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय धोक्यात येणार आहे. आदी अनेक त्रुट्या शिष्टमंडळाने राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या