शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यांवर लाखोची उधळपट्टी

By admin | Updated: May 21, 2017 03:33 IST

पालघर जिल्हातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, डहाणू, वसई, पालघर, तालुक्यातील विवाह सोहळ्यांवर सध्या केवळ बडेजाव मिरविण्यासाठी लाखोंची उधळपट्टी

- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्र मगड : पालघर जिल्हातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, डहाणू, वसई, पालघर, तालुक्यातील विवाह सोहळ्यांवर सध्या केवळ बडेजाव मिरविण्यासाठी लाखोंची उधळपट्टी वधू व वरपक्ष कर्जबाजारी होऊन सध्या करीत आहे. हा समाज शेती हाच व्यवसाय करत असल्याने त्याचे उत्पन्न अल्प आहे. त्यात यंदा पीककर्ज मिळण्याची मारामार आहे. तरीही केवळ अनुकरण म्हणून अथवा समाजाच्या दबावापायी सर्वच समाजातील विवाह सोहळ्यात दोन दिवसात लाखोंचा चुराडा होतो आहे.खोट्या श्रीमंतीच्या, प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन वधूपिते सोने अथवा शेतजमिन विकणे अथवा गहाण ठेवणे, हा मार्ग पत्करून विवाहासाठी कर्ज काढत आहेत. त्याची परतफेड करायची कशी? याचा मात्र कोणताही विचार त्यांनी केलेला नाही. डी.जे., बँड, मंडप, स्टेज, लग्न पत्रिका, कॅटरर, चिकन, मटणाची जेवणावळ, आईस्क्रीम, कपडालत्ता आदींचे भाव प्रचंड वाढले असले तरी अनेक समाजात कर्जे काढू पण लग्न थाटात करूया बडेजावाने खर्च होत आहे. स्वस्तातला बँजो नाकारून हजारो बिदागीच्या डीजे साठी वऱ्हाड मंडळीत चुरस सुरु आहे. संपूर्ण वर्षभर सणावाराला खिशाला चाट देणाऱ्या मध्यमवर्गीयांचा विवाह सोहळाही डोळे पांढरे करणारा असतो. साक्षींगध व साखर पुड्यासाठी वेगळाच पायंडा तयार होत आहे. मध्यमवर्गीयांच्या लग्नाची रोकड साखरपुड्याच्या सोहळ्यातच खर्च होते आहे. हजारो रुपयांचे मानाचे कपडे वधू पक्षाकडील मंडळीना खरेदी करावे लागत आहे. भला मोठा मंडप, नाहीतर लॉन महागडी आकर्षक लग्नपत्रिका, मांसाहारी मेजवानी, आईस्क्रि म या बाबी अपरिहार्य आहेत. अनेकांनी नातेवाईकांकडून कर्जे घेतली तर काहींनी भरमसाठ व्याजाची पर्सनल लोन घेतली आहेत. पण त्याच्या परतफेडीचा विचार मात्र कोणी करत नाही. त्यामुळे विवाहात मिळालेल्या चैनी वस्तूंची विक्री कर्जफेडीसाठी करायची वेळ येते आहे.लग्नासाठी लागणारे साहित्य - बँजो २० ते २५ हजार रु , - स्टेज, खुर्च्या, लायटिंग १३ ते १५ हजार, - मंडप २४ ते २५ हजार, - जेवणाचे टेबल व खुर्च्या ७ ते ८ हजार रु, - वरातीसाठी लागणाऱ्या बसेस व खाजगी गाड्या १० ते १२ हजार, - जेवणासाठी लागणाऱ्या भांड्यांचे भाडे ७ ते ८ हजार, - जनरेटर भाडे ३ ते ५ हजार रु .- लग्न पत्रिका (१०००) १२ ते १४ हजार, - महागाईमुळे मटणाचे भाव वाढल्याने १०० किलो मटणासाठी २४ ते २५ हजार रु पये मोजावे लागत आहेत, त्यात विदेशी मद्य, आईस्क्रि म याची भर पडल्यास एकूण ३ ते ४ लाख रु पये खर्च होत असल्याने वधू-वर पक्षाचे कंबरडे मोडले आहे यावर सामुहिक विवाह हा एकमेव उपाय ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे यामुळे महागाईच्या काळात सुध्दा वधू वर पक्षाकडून होणाऱ्या विवाह खर्चात बचत होऊन जमिनी विक्री, दागिने गहाण टाकण्याची वा कर्जे घेण्याची वेळ येणार नाही असे जाणकारांचे मत आहे .ग्रामीण भागात प्रामुख्याने शेती हेच उदरनिर्वाह साधन आहे. परंतु सध्या तीच धोक्यात आली आहे. त्यामुळे कर्जबाजारी होण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे अन्य मार्ग नाही. लेकीच्या विवाहाच्या कर्जाची फेड मुलाच्या विवाहातून करण्याची अनिष्ट प्रथाही रुजते आहे.-डॉ. सतोष भरसट, एमडी, विक्र मगडमध्यमवर्गीयांनी महागाईच्या काळात सामूहिक विवाह पद्धती अनुसरावी त्यामुळे दोन्ही पक्षाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल.-सरस्वती नडगे, भोये, महिला दक्षता कमिटी अध्यक्षसमाज प्रबोधन करून अनेक समाज संघटनानी सामूहिक विवाह सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करायला हवे तरच विवाहातून कर्जबाजारी होण्याची पाळी टाळता येईल.ङ्क्त- प्रकाश चौधरी, रा.स्व.संघाचे कार्यकर्ते विक्र मगड