शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

कांदळवन-पाणथळच्या संरक्षणासाठी मनपाचा इशारा

By admin | Updated: April 27, 2017 14:54 IST

कांदळवन, पाणथळ क्षेत्रात बांधकामे व खारफुटीची तोड रोखण्यासाठी आता शासन, पोलीस व महापालिका यांचे संयुक्त इशारे वजा फलक लावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत/धीरज परब 
मीरारोड, दि. 27 - कांदळवन, पाणथळ व सीआरझेड १ या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनील असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चालणारा भराव, बांधकामे व खारफुटीची तोड रोखण्यासाठी आता शासन, पोलीस व महापालिका यांचे संयुक्त इशारे वजा फलक लावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. शहरात पहिल्या टप्प्यात १५० फलक लावले जाणार आहेत. 
 
मीरा भार्इंदर शहर हे तीन्ही बाजुने समुद्र व खाडीने वेढले असुन मोठ्या प्रमाणात नैसर्गिक कांदळवन, पाणथळ क्षेत्र आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका असलेल्या कांदळवन व पाणथळ क्षेत्रात तसेच सीआरझेड १ मध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा, दगड-माती, डॅब्रिसचा भराव करण्यास ; कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास तसेच खारफुटीची तोड करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी आदेश देऊन प्रतिबंध घातला आहे. 
 
तसे असताना मीरा भार्इंदर मध्ये मात्र लोकप्रतिनिधी, बिल्डर, भुमाफिया तसेच माती व चाळ माफियांसह महापालिकेने देखील मोठ्या प्रमाणात उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन करुन या प्रतिबंधीत क्षेत्रात बेकायदा भराव, बांधकामे व खारफुटीची तोड केली आहे. अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांचा सुद्धा आरोपींमध्ये समावेश आहे. 
 
दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी आता शहरात १ लाख कांदळवनाची झाडं लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवीदा प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरी कडे कांदळवन, पाणथळ व सीआरझेड १ मध्ये होणारा भराव , बांधकामे व खारफुटीची तोड रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात जागोजागी दीडशे फलक लावण्यास घेतले आहेत. 
 
सदर लोखंडी फलक वर उच्च प्रतिच्या रेडियमचा वापर करण्यात आला असुन रात्रीच्या वेळी देखील त्यावरचा मजकुर स्पष्टपणे वाचता येईल. सदर दीडशे फलकांसाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च आहे. प्रत्येक प्रभाग समिती निहाय हे फलक लावले जात असून त्यावर तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकासह प्रभाग समिती कार्यालयचा दूरध्वनी क्रमांक व ईमेलचा पत्ता देण्यात आला आहे. 
महत्त्वाचे म्हणजे सदर फलकावर राज्य शासन, पोलीस व महापालिका अशा तिन्ही यंत्रणांचा उल्लेख असून त्यांचे बोधचिन्ह टाकण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पालिका आयुक्तांचा उल्लेख आहे. महापालिकेसह पोलीस व शासनाच्या महसुल विभागाकडूनदेखील कारवाई केली जाणार असल्याने पर्यावरणाचा -हास करणा-यांना जरब बसेल असा विश्वास पालिकेला आहे. 
 
फलकावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी व खासगी जमिनीतील कांदळवन, पाणथळ व सीआरझेड १ मध्ये कोणत्याही प्रकारचा भराव, बांधकाम व वृक्षतोड  करण्यास प्रतिबंध घातल्याचे नमुद करत उल्लंघन करणा-यास कैद व दंडात्मक शिक्षेचा इशारा दिला आहे. येथील खारफुटी, अन्य वनस्पती व वन्यजीवाची हानी करु नये असे बजावण्यात आले आहे. 
दीपक खांबित ( कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग ) - उच्च न्यायालयाचे आदेश व पर्यावरण संरक्षणा साठी पालिकेने जागोजागी इशारे वजा फलक लावण्यास घेतले आहेत. पहिल्या टप्प्यात दीडशे फलक लावणार आहोत. नंतर आणखी फलक लावले जातील.