शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आपत्कालीन समितीची बैठक

By admin | Updated: November 26, 2015 01:23 IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प क्षेत्राच्या परिसरातील वातावरणामध्ये अकस्मातपणे किरणोत्सर्गाची दुर्घटना घडल्यास नागरिकांनी सुरक्षिततेबाबत कोणती खबरदारी घ्यावी

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प क्षेत्राच्या परिसरातील वातावरणामध्ये अकस्मातपणे किरणोत्सर्गाची दुर्घटना घडल्यास नागरिकांनी सुरक्षिततेबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याची पूर्ण माहिती त्यांना कळणे अत्यावश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी परिसरातील प्रत्येक गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन करून जनजागृती करावी, असे सूचनावजा आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बैठकीत दिले.तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जिल्हास्तरीय आपत्कालीन उपाययोजना समितीची बैठक शुक्रवारी जिल्हापरिषद संकुल, पालघर येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, अणुऊर्जा प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात किरणोत्सारासारखी दुर्घटना घडल्यास कायकाय उपाययोजना आखता येतील, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन मार्गदर्शन केले. या परिस्थितीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन अफरातफरी माजू नये म्हणून त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे. अशा वेळी गावागावांतून जाणारे रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद असल्याचे सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आले. अशा अरुंद रस्त्याबाबत नियोजनबद्ध आराखडा, अंदाजपत्रक तयार करून परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे लवकरच सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.मुरबे-खारेकुरण खाडीवर पूल उभारण्याबाबत संकल्पचित्र तयार करण्यात आले असून अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्याचे काम सुरू आहे. यावेळी प्रकल्पाचे वैज्ञानिक अधिकारी आर.एच. पाटील यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)