शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वसई-विरारच्या महापौरांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:41 IST

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेला बदल असल्याचे मत : उमेश नाईक यांच्या नावाची चर्चा

नालासोपारा : वसर्ई - विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर रूपेश जाधव यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आणि हितेंद्र ठाकूर यांनी तो लगेच स्वीकारल्याने वसई-विरारमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. महापौरांच्या राजीनाम्यानंतर उमेश नाईक या पक्षातील वरिष्ठ चेहऱ्याला महापौरपदी बसण्याची संधी देण्यात येऊ शकते, सध्या त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे.पुढील वर्षी वसई-विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून महापौरपद हे राखीव वर्गासाठी असल्याने एका वर्षासाठी पक्षातील सर्वसाधारण वर्गातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास या पदावर बसण्याची संधी द्यावी, असा विचार करून महापौर पदाचा त्याग केल्याची भावना महापौर रूपेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपाºयाच्या रणांगणात उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मने जपण्यासाठी तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करून नालासोपाºयातील बहुजन विकास आघाडीच्या मतांची मोट बांधण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बविआचे बळीराम जाधव यांना नालासोपाºयातून सपाटून मार खावा लागला होता. नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असतानादेखील येथे शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना तब्बल २६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. महापौर जाधव यांच्या आचोळ्यातील प्रभागातूनही राजीव गावित यांना मतांची आघाडी मिळाल्याने हितेंद्र ठाकूर नाराज होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ही उमेदवारी प्रदीप शर्मा यांना देऊ केल्याचे समजते. उत्तर भारतीय मतांची मोट बांधण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचा अंदाज आहे. अशातच बहुजन विकास आघाडीतील नाराज कार्यकर्ते तसेच अंतर्गत दुफळी भरून काढण्यासाठी पक्षीय स्तरावर मोठे बदल करण्याच्या हालचाली बविआच्या गोटातून सुरू झाल्या आहेत. राजीनामा हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेला बदल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जाधव हे एकमेव महापौर आहेत ज्यांनी एवढे मोठे पद दुसऱ्यांसाठी सोडले आहे. त्यांच्या या त्यागामुळे ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झाले, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

वसई विरार महापालिकेच्या महापौर पदाचा राजीनामा स्वत:हून दिला आहे. जानेवारी २०१८ मध्ये महापौर पद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले होते. परंतु हितेंद्र ठाकूर यांनी माझ्यासारख्या दलित वर्गातील तरूणाला या पदावर विराजमान होण्याची संधी दिली. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराला महापौर पद मिळावे यासाठी स्वत:हून हा राजीनामा दिला आहे. - रु पेश जाधव (माजी महापौर, वसई विरार महानगरपालिका)