शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

वसई-विरारमध्ये मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:48 IST

वसई विरारमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

विरार : वसई विरारमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पाऊस अधून मधून थांबत असला तरी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना अनेक ठिकाणी पाण्यामुळे अडथळे निर्माण झाले. विरार पश्चिमेकडील जुना विवा कॉलेज समोर गुडघ्या इतके पाणी साचले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.एकीकडे पावसाच्या येण्याने ग्रामीण भागात आनंद आहे तर दुसरीकडे शहरी भागात जागो-जागी पाणी साचल्याने महानगरपालिकेने केलेली नाले सफाई चव्हाट्यावर आली. गालानगर, एमडी नगर, आचोळे, सेन्ट्रलपार्क, तुळींज पोलीस ठाणे, तुळींज रोड, टाकी रोड आदी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे रिक्षा, मोटारसायकलींना पुढे जाता येत नव्हते. त्यातच पाणी शिरल्याने काही ठिकाणी वाहने नादुरुस्त झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.नागरिकांच्या रोजच्या रहदारीच्या स्टेशन जवळील मुख्य रस्त्यावरच गुढग्या इतके पाणीसाचल्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सकाळी कामानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांना वाहतुकीच्या समस्येचाही सामना कारावा लागत आहे. कुठे रस्त्यावर पाणी साचले असल्यामुळे रिक्षावाले नेहमीच्या मार्गाने जाण्यास तयार होत नाहीत तर, कुठे पाण्याच्या पातळीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यातच मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशिर झाला. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. सेंट्रलपार्क, तुळींज रोड, विजय नगर येथे तर अक्षरश: रस्त्यांना नदीचं स्वरूप आले होते.तारापूर - बोईसर परिसरात पहाटे पासून अवघ्या सहा तासात सुमारे २०० मि. मी. पाऊस पडून पावसाने दमदार आगमन केले मात्र, पहिल्याच पावसात नागरीवस्त्या, चाळी व एमआयडीसी सह सर्वत्र पाणी साचून काही रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच बरोबर सर्वत्र वीज गुल झाल्याने महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला