शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मार्क्सवाद्यांचा तहसीलपुढे ठिय्या, स्वयंपाकही केला;लाँगमार्चच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:44 IST

पालघर : शेतकरी, तरुण, महिला व कामगारांच्या मागण्या महाघेराव व लॉंगमार्च नंतर शासनाने मान्य केल्यात. परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाने न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ठिय्या आंदोलन करून रस्ते जाम करण्यात आले. मागण्या प्रत्यक्ष मान्य होईपर्यंत हा ठिय्या कायम राहणार असल्याने आंदोलकांनी तिथेच स्वयंपाकही केला. ...

पालघर : शेतकरी, तरुण, महिला व कामगारांच्या मागण्या महाघेराव व लॉंगमार्च नंतर शासनाने मान्य केल्यात. परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाने न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ठिय्या आंदोलन करून रस्ते जाम करण्यात आले. मागण्या प्रत्यक्ष मान्य होईपर्यंत हा ठिय्या कायम राहणार असल्याने आंदोलकांनी तिथेच स्वयंपाकही केला. ते सोबत अंथरुण, पांघरुणही घेऊन आलेले होते.आदिवासी, शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सत्ताधारी सरकार विरोधात नाशिक येथे महामुक्काम, वाड्यात महाघेराव तर नाशिक-मुंबई लाँगमार्च काढण्यात आला होता. या आंदोलनापुढे नमते घेऊन शासनाने मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे असून गोदूताई परु ळेकरांच्या स्मृतीदिन आणि तलवाडा येथे झालेल्या गोळीबाराची आठवण म्हणून पालघर तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर झालेल्या या आंदोलनामुळे रस्ता जाम झाला होता. तसेच जिल्ह्यात शेती, वस्त्यांना उध्वस्त करणारे बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरिडॉर, महामार्ग स्थानिकांच्या उरावर लादण्यात येत असल्याच्या विरोधात तसेच वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे, कूळकायद्याच्या जमिनीची लूट थांबविणे, पीक पाहणी अंमलबजावणी, पाटबंधाºयाचे पाणी स्थानिक शेतकºयांना, जनतेला मिळावे, रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करून गैरव्यवहाराना आळा घालावा, रोजगार निर्मिती करावी आदी मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या.चर्चासाठी वरिष्ठ अधिकारीच नाहीविक्रमगड : भाजप प्रणित केद्रं व महाराष्ट्र सरकारचे धनिक धार्जिणे धोरण व खोटया जाहिराती सुरू असून आदिवासींचे हाल होत आहेत. याकडे शासन लक्ष न देता फक्त आश्वासने देत आहेत. या विरुध्द हे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची माहिती कॉ. किरण गहला यांनी दिली. महागाई वाढते आहे, डिझेल पेट्रोल, गॅस सिलिंडरचे भाव तर गगनाला भिडले आहे. परंतु शेत मालाला हमी भाव नाही. नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई नाही. नोटा बंदीमुळे सर्वसामान्याचे आजही हाल होत आहेत. रेशनकार्डावर धान्य मिळत नाही. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, वन अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. रोजगार हमीची कामे सुरू करा, या मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.प्रांत कार्यालयावर ठिय्यावाडा : केंद्र व राज्यसरकारच्या धोरणांविरोधात व वाढत्या महागाईविरोधात, तसेच सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या निषेधार्थ मार्क्सवाद्यांनी बुधवारी येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.डहाणूतही दिला ठिय्याडहाणू : तालुक्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी, यामागणीसाठी मार्क्सवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यात कॉ. एडवर्ड वरठा, कॉ .लडका कलंगडा, कॉ.लहानी दवडा आदी सहभागी होते.तलासरीतही माकपचे ठिय्या आंदोलनतलासरी : १० आॅक्टोबरला पालघर जिल्ह्यात दरवर्षी माकपतर्फे पाळण्यात येणारा हुतात्मा दिन आणि कॉ. गोदावरी परु ळेकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तहसीलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय या जनसंघटनाही सामील झाल्या. शेतकºयांना देशोधडीला लावणारे बुलेट ट्रेन, एक्सप्रेस हायवे आणि नदीजोड सारखे प्रकल्प ताबडतोब रद्द करा; वनजमिनी, वरकस जमिनी, देवस्थान व गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे करा, धरणांचे पाणी येथील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी प्राधान्याने द्या आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार