शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तारापूर मंडळ कार्यालयावर मार्क्सवाद्यांचा मोर्चा

By admin | Updated: February 21, 2017 05:14 IST

जनरल कामगार युनियन (लालबावटा) आणि भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे कामगार, मच्छीमार, प्रकल्पग्रस्त,

बोईसर : जनरल कामगार युनियन (लालबावटा) आणि भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे कामगार, मच्छीमार, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, युवक व महिलाचा तारापूर (कुरगांव) मंडळ कार्यालया वर मोर्चा काढण्यात आला होता.जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. बळीराम चौधरी, जिल्हा सेक्रेटरी कॉ. संज्योत राऊत, तालुका सेक्रेटरी, कॉ. महेश बारगा, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. राजेश दवणे, कॉ. श्याम नाईक, कॉ. प्रमिला हाडल, कॉ. साईनाथ तामोरे, कॉ. प्रतिक्षा धनु, कॉ. सुरेखा तामोरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. त्यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये तारापूर अणूविद्युत प्रकल्पातील कामावरून कमी केलेल्या व बीएआरसी मधील कामावरून कमी केलेल्या कामगारांना न्याय द्या, तारापूर अणू विद्युत प्रकल्पातील बंद केलेली रोजगाराभिमुख सर्व कंत्राटी कामे पुन्हा सुरु करा, सर्व कामगारांना किमानवेतन मिळालेच पाहिजे, योग्य देखभाली अभावी प्लॅँट व टॅप्स कॉलनीच्या गार्डन मधील झाडे सुकून जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी गार्डनची कामे पूर्ववत सुरु करा, टॅप्स १ ते ४ मधील ज्या कंत्राटदारांनी कामगारांची ए टी एम कार्डे स्वत: जवळ ठेवली आहेत. ती कामगारांना परत द्या, एमआयडीसी मध्ये आठ तास कामाची वेळ अमलात आणा, जी कामे वर्षानुवर्षे कायम स्वरूपात चालतात तिथे कामगारांना कायमस्वरूपी काम मिळाले पाहिजे. पोफरण व अक्कपट्टी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या. सर्व प्रकल्पग्रस्तांचे सुयोग्य पुनर्वसन करा, एनपीसीआयएल व तारापूर एमआयडीसीमधील सीएसआर फंडाचा निधी हा परिसराच्या विकासासाठीच वापरला जायला हवा. हा निधी अन्यत्र वळवणे बंद करा. तसेच त्याच्या विनिमयाची नियमावली बनवा, तारापूर अणूविद्युत प्रकल्पाला भारताचे न्यूक्लिअर डंपिंग ग्राउंड बनवणे बंद करा, न्यूक्लिअर वेस्टचे योग्य व्यवस्थापन करा, बारहजारी ते पाचमार्ग रस्त्याची दुरु स्ती करा व या रस्त्याची कायमस्वरूपी देखभाल करा, तारापूर अणूविद्युत केंद्रासाठी आपत्कालीन योजनेचा भाग म्हणून दांडी ते नवापूर दरम्यान पूल बांधा, तारापूर अणूविद्युत केंद्राजवळील पाच किलोमीटरच्या परिक्षेत्रात पक्क्या रस्त्यांचे जाळे वाढवा, वाढवण व आलेवाडी येथील नियोजित बंदर प्रकल्प रद्द करा. समुद्री पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्प रद्द करा अशाविविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)