शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

मेरीटाइम हलगर्जीचा मच्छीमारांना फटका

By admin | Updated: August 13, 2015 23:10 IST

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका सातपाटीच्या मासेमारी व्यवसायाला बसत असून दोन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर पहिल्याच ट्रीपसाठी

पालघर : महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका सातपाटीच्या मासेमारी व्यवसायाला बसत असून दोन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर पहिल्याच ट्रीपसाठी समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या किशोर आ. मेहेर यांची ‘नारायणी’ ही बोट नौकायन मार्गावरील खडकावर बुधवारी धडकली. यामध्ये बोटीचे मोठे नुकसान होऊन जीवितहानी टळली.सातपाटी हे एक प्रगतिशील बंदर असून पालघर जिल्ह्यातून सर्वात जास्त मत्स्य उत्पादनाची (कोट्यवधी रुपये) उलाढाल दोन सहकारी संस्थांमार्फत करण्यात येते. यातून लाखो रु.चे परकीय चलन शासनाकडे जमा होत असते. मात्र, ८ ते १० वर्षांपासून सातपाटीची खाडी गाळाने भरली असून मच्छीमारांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. सातपाटी खाडीच्या नौकानयन मार्गात अनेक सॅण्डबार व खडक निर्माण झाले असून खाडीमध्ये उंच वाळूची पठारे निर्माण झाली आहेत. त्यामुळे मासेमारीला जाण्यासाठी मच्छीमारांना मोठ्या उधाणाची वाट पाहावी लागते. परिणामी, मासेमारीचे दिवस वाया जात मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाययोजना आखावी म्हणून मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली ११ आॅगस्ट रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित बांगर, कृती समिती सरचिटणीस नरेंद्र पाटील, मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, आ. विलास तरे, आ. पास्कल धनारे, जि.प. उपाध्यक्ष सचिन पाटील, सभापती अशोक वडे, ज्योती मेहेर, बविआचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील इ. सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये निधी उपलब्ध असतानाही तो वापरला जात नसल्याने पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे येत्या पाच दिवसांत आपण खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करणार असल्याचे आश्वासन मेरीटाइमचे अभियंते देवरे यांनी दिल्याचे राजन मेहेर यांनी सांगितले. अशी अनेक आश्वासने आतापर्यंत देवरे यांनी मच्छीमारांना दिली असून त्यांच्या दुर्लक्षामुळे सातपाटी खाडीतील समस्यांवर उपाययोजना केल्या जात नसल्याने काल दुपारी धोकादायक खडकाजवळ कुठलेही गाइड पोल उभारले गेले नसल्याने किशोर मेहेर यांची बोट खडकावर आदळली. या वेळी रत्नाकर मेहेर यांच्यासह त्याच्या बोटींनी तत्काळ मदत पोहोचवली नसती तर प्राणहानीसह मोठी वित्तहानीची घटना घडली असती. (वार्ताहर)