शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षकच नाहीत

By admin | Updated: August 25, 2015 23:10 IST

वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत

वसई : वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत समिती प्रशासनाचे नियंत्रण नसणे अशा सर्व गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अनेक शाळांत शिक्षक नसल्यामुळे सोमवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला.वसईतील शिक्षण विभाग सतत प्रकाशझोतात असतो. चार वर्षापूर्वी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आग लागून महत्वाची कागदपत्रे जळाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात येऊनही तपासाचा अहवाल दडपण्यात आला. शिक्षकांच्या बदली प्रकरणीही अनेक गैरप्रकार आजवर घडले आहेत. या विभागाला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही. या पदाचा चार्ज कोणाकडे हा वाद सध्या विकोपाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बेलकडी, लेंडीपाडा, दहीसर, बरफपाडा, वरठापाडा, म्हस्करपाडा, साष्टीकरपाडा, देपेवली, उसगाव, ताडपाडा, दिवेकरपाडा, बिबीपाडा, टेपाचापाडा येथील सर्व शाळांमध्ये शिक्षकच नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने वसई पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला होता. जोवर शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार वक्त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केला. तरी प्रशासन मात्र अजूनही मौनीबाबा आहे. (प्रतिनिधी)