शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षकच नाहीत

By admin | Updated: August 25, 2015 23:10 IST

वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत

वसई : वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत समिती प्रशासनाचे नियंत्रण नसणे अशा सर्व गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अनेक शाळांत शिक्षक नसल्यामुळे सोमवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला.वसईतील शिक्षण विभाग सतत प्रकाशझोतात असतो. चार वर्षापूर्वी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आग लागून महत्वाची कागदपत्रे जळाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात येऊनही तपासाचा अहवाल दडपण्यात आला. शिक्षकांच्या बदली प्रकरणीही अनेक गैरप्रकार आजवर घडले आहेत. या विभागाला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही. या पदाचा चार्ज कोणाकडे हा वाद सध्या विकोपाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बेलकडी, लेंडीपाडा, दहीसर, बरफपाडा, वरठापाडा, म्हस्करपाडा, साष्टीकरपाडा, देपेवली, उसगाव, ताडपाडा, दिवेकरपाडा, बिबीपाडा, टेपाचापाडा येथील सर्व शाळांमध्ये शिक्षकच नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने वसई पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला होता. जोवर शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार वक्त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केला. तरी प्रशासन मात्र अजूनही मौनीबाबा आहे. (प्रतिनिधी)