शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षकच नाहीत

By admin | Updated: August 25, 2015 23:10 IST

वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत

वसई : वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत समिती प्रशासनाचे नियंत्रण नसणे अशा सर्व गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अनेक शाळांत शिक्षक नसल्यामुळे सोमवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला.वसईतील शिक्षण विभाग सतत प्रकाशझोतात असतो. चार वर्षापूर्वी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आग लागून महत्वाची कागदपत्रे जळाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात येऊनही तपासाचा अहवाल दडपण्यात आला. शिक्षकांच्या बदली प्रकरणीही अनेक गैरप्रकार आजवर घडले आहेत. या विभागाला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही. या पदाचा चार्ज कोणाकडे हा वाद सध्या विकोपाला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बेलकडी, लेंडीपाडा, दहीसर, बरफपाडा, वरठापाडा, म्हस्करपाडा, साष्टीकरपाडा, देपेवली, उसगाव, ताडपाडा, दिवेकरपाडा, बिबीपाडा, टेपाचापाडा येथील सर्व शाळांमध्ये शिक्षकच नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने वसई पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेला होता. जोवर शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार वक्त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केला. तरी प्रशासन मात्र अजूनही मौनीबाबा आहे. (प्रतिनिधी)