शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

पीककर्जवाटपात अनेक राष्ट्रीयीकृत बँका ठरल्या अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 03:38 IST

खरीप पीक कर्ज वाटपात जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकाना दिलेले लक्ष्यांंक (टार्गेट) पूर्ण करण्यात अनेक बँका अयशस्वी ठरल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

- हितेन नाईकपालघर - खरीप पीक कर्ज वाटपात जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकाना दिलेले लक्ष्यांंक (टार्गेट) पूर्ण करण्यात अनेक बँका अयशस्वी ठरल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. कर्ज वाटपात उदासीन धोरण स्वीकारणाऱ्या बँकांना अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर ह्यांनी बँकांना दिलेल्या धक्का तंत्राची अंमलबजावणी आमचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे करतील काय? असा प्रश्न कर्जा पासून वंचित असलेले शेतकरी विचारीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी सर्व सेवा अभियानांतर्गत कुठलाही जामीनदार न घेता शेतकºयांना कर्जवाटप करण्याचे आदेश दिले होते. मात्र राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या कुठल्याही आदेशाला न जुमानता आरबीआय ने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास आम्ही बांधील असल्याचे त्यांच्या कर्जवाटपावरून दिसते आहे. दिवंगत खासदार चिंतामण वणगां हे देखील मुद्रा बँकांतील कर्ज वाटपातील दिरंगाईचे बळी ठरले होते. शासकीय खात्यातील जामीनदार आणल्याशिवाय आम्ही कर्ज देणार नसल्याचे बँक अधिकारी आपल्याला सांगत असल्याचे ते व्यासपीठावरून अनेक वेळा बोलले होते.केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या सरकारच्या खासदाराची ससेहोलपट राष्ट्रीयकृत बँकानीच केल्याने त्या बँकांच्या अधिकाºयांची मस्ती वाढली होती. त्यामुळेच पीककर्ज वाटपाच्या टक्केवारीत सतत घसरण होतेआहे.आतापर्यंत फक्त १० टक्के कर्जाचे केले आहे वाटपजिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेच्या नेतृत्वाखाली विविध बँकांच्या अधिकाºयांच्या जिल्हा आर्थिक समितीद्वारे जिल्ह्यातील बँकांना खरीप कर्ज, उद्योग उभारणाºया बेरोजगार, व्यावसायिक आदींना कर्ज वाटपाचा लक्षांक दिला जातो.जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आलेल्या ४६.०९ कोटी लक्ष्यांकांपैकी आजवर फक्त ९ कोटी ४८ लाख रुपयाचे कर्ज त्यांनी वाटप केले आहे.याउलट सहकारी बँकांची याबाबतची कामिगरी समाधानकारक म्हणावी लागेल.राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपा बाबतची उदासीनता पाहता मी आमच्या विविध विभागांची ७ खाती एसबीआय बँकेतून बंद करून ती युनियन बँकेत सुरू केली.त्यामुळे कमिर्शयल बँकांतील कर्ज वाटपाचे प्रमाण ३ टक्के वरून २७ टक्केवर आले आहे.-अभिजित बांगर,जिल्हाधिकारी, अमरावतीशेतकºयांना कर्ज वाटप करण्याबाबत आमची बँक अग्रेसर असून ९० कोटी वाटपपैकी आम्ही ४५ टक्के लक्ष्यांक पूर्ण केला आहे. अनेक मेळावे घेऊन आम्ही पात्र शेतकºयांना पत्र पाठवून कर्ज मंजूर झाल्याचे कळवितो.- राजेंद्र पाटील,अध्यक्ष.टीडीसी बँक.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbankबँक