मनोर : प्रत्येक शनिवारी भरणारा मनोरचा आठवडा बाजार भरलाच नाही. गर्दी फक्त बँकांच्या समोर दिसत होती खरेदी करण्यासठी सुटे पैसे नसल्याने ग्राहक दुकानात फिरकलेच नाही. जो ग्राहक ५०० ची नोट घेऊन दुकानात जात होता त्यास दुकानदार कडे सुटे पैसे देण्यासाठी नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागले. जिथे ४० ते ४५ लाख रुपयांची उलाढाल व्हायची तिथे लाखभराचीही उलाढाल झाली नाही.पालघर तालुक्यात मनोर ही पन्नास ते साठ गावांसाठीची एकमेव बाजारपेठ असून प्रत्येक शनिवारी आठवडा बाजार भरतो. त्यावेळी लोक या बाजारात खरेदीसाठी आवर्जून येतात. आठवडाभराच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात. या बाजार पेठेत ५० किराणा दुकाने, कापडाची २५ ते ३० दुकाने, औषधाची ८ दुकाने, कटलरी, भांड्याची ११ दुकाने, भाजीपाल्याची ७ मोठी दुकाने, घरगुती वस्तूंची ५० ते ६० छोटी दुकाने, सुकीमासळी, ओलीमासळी, मटन, चिकन ,ज्वेलर्स अशी शेकडो दुकाने असतात. बाजार एवढा खच्चून भरतो की गर्दीत वाट काढणे अशक्य होते. परंतु ५००व १००० च्या नोटा रद्द झाल्याने आज आठवडा बाजारावर त्याचा विपरीत परिणाम झाला. सर्वजण एकाच कामात अडकले होते. ते म्हणजे बँकेतून नव्या नोटा घेणे. बाजारातील गर्दी ही महाराष्ट्र बँक , टीडीसी, इलाहाबाद बँक, जव्हार अर्बन बँकांपुढे दिसत होती ज्यांच्या जवळ हजार पाचशे च्या नोटा हात्या ते दुकान जाऊन वस्तू खरेदी करीत मात्र दुकान दारांकडे त्यांना देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने त्या ग्राहकांना एकतर रिकाम्या हाताने परतावे लागत होते. तर कोणी आवश्यकता नसतांना पूर्ण पैशाची खरेदी करीत होते. विनोद जैन भांडी दुकानदार म्हणाले की ग्राहक दुकानात येत होते परंतु त्यांना देण्यासाठी माझ्या कडे सुटे पैसे नसल्याने त्यांना परत जावे लागले कारण मार्केट मध्ये सुट्टे पैसे आलेच नाही आम्ही दुकानदार काय करणार, सुनील लोखंडे म्हणाले की पहिल्यांदा आठवडा बाजार भरला नाही कारण लोकांकडे पैसेच नाही त्या मुळे आम्हा दुकांदारचे ही मोठे नुकसान होत आहे.कांतीलाल जैन म्हणाले की, मोदीजींनी केले ते योग्य केले परंतु या मध्ये सर्वसामान्य लोकांची गोची झाली आहे.
मनोरचा आठवडेबाजार पडला ओस
By admin | Updated: November 13, 2016 00:25 IST