शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:05 IST

आंब्याला उशिरा मोहोर

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यात या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याचा परिणामआंबा फळ पिकावर होण्याची शक्यता असून आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन लांबण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढत चाललेला लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस व त्यामुळे वातावणात होणारा वारंवार बदल याचा परिणाम आंब्यासारख्या हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते, मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावली. खरे तर नोव्हेंबर महिन्यात थंडी पडायला व डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होत असते, मात्र थंडीचा मोसम पाहिजे तसा नसल्याने आंब्याला मोहोर येण्याचा हंगाम पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आंबा पिकावर होऊन आंब्याचे पीक ३० ते ३५ दिवस उशिराने येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बागायती शेतकरी आंबा पीकघेतात.

विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवडीचे उत्पादन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यात आंबा बागायदार झडपोली, माण, ओंदे, आलोंडे, केव, कुरंजे आदी भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेत असून चांगला नफा मिळवत आहेत. परंतु गेल्या दोन-चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातून जात असतो, मात्र या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावली. त्यातच नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते, मात्र या वर्षी पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची शक्यता असून याचा परिणाम आंबा हंगाम लांबण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या वर्षी परतीचा पावसाने नोव्हेंबर महिन्यापर्यंत हजेरी लावली तसेच पाहिजे तेवढी थंडी अद्यापपर्यंत नसल्याने याचा परिणाम आंबा मोहर उशिराने येऊन आंबाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.-विजय सांबरे, आंबा उत्पादक शेतकरी, ओंदे

टॅग्स :MangoआंबाVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र