शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:05 IST

आंब्याला उशिरा मोहोर

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यात या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याचा परिणामआंबा फळ पिकावर होण्याची शक्यता असून आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन लांबण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढत चाललेला लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस व त्यामुळे वातावणात होणारा वारंवार बदल याचा परिणाम आंब्यासारख्या हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते, मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावली. खरे तर नोव्हेंबर महिन्यात थंडी पडायला व डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होत असते, मात्र थंडीचा मोसम पाहिजे तसा नसल्याने आंब्याला मोहोर येण्याचा हंगाम पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आंबा पिकावर होऊन आंब्याचे पीक ३० ते ३५ दिवस उशिराने येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बागायती शेतकरी आंबा पीकघेतात.

विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवडीचे उत्पादन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यात आंबा बागायदार झडपोली, माण, ओंदे, आलोंडे, केव, कुरंजे आदी भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेत असून चांगला नफा मिळवत आहेत. परंतु गेल्या दोन-चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातून जात असतो, मात्र या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावली. त्यातच नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते, मात्र या वर्षी पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची शक्यता असून याचा परिणाम आंबा हंगाम लांबण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या वर्षी परतीचा पावसाने नोव्हेंबर महिन्यापर्यंत हजेरी लावली तसेच पाहिजे तेवढी थंडी अद्यापपर्यंत नसल्याने याचा परिणाम आंबा मोहर उशिराने येऊन आंबाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.-विजय सांबरे, आंबा उत्पादक शेतकरी, ओंदे

टॅग्स :MangoआंबाVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र