शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

वसईच्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करा

By admin | Updated: August 13, 2016 03:54 IST

वसई पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजेचे असल्याचा वसईतील बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचा मतप्रवाह आहे. जुना उड्डाणपूल बांधून

वसई : वसई पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजेचे असल्याचा वसईतील बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचा मतप्रवाह आहे. जुना उड्डाणपूल बांधून जवळपास ४० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. नवीन उड्डाणपुलाच्या बांधणीनंतर जुन्या पुलावरील भारमान कमी झाले असले तरी आज हा पूल वाहतूक सेवेत कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर पुलाच्या व पुलावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.महाड येथील सावित्री नदी पूल दुर्घटनेनंतर राज्यातील जुन्या पुलांचा प्रश्न चर्चेत आला आहे. राज्य शासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व जुन्या पुलांच्या सुरक्षेला आता प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर वसई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी या रेल्वे लाइनवर हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. त्यावेळचे वाहतूक भारमान व वाहतुकीला केंद्रित ठेवून या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तेव्हाच्या व आताच्या वाहतूक भारमानात प्रचंड तफावत आहे. वसईची वाढती वाहतूक लक्षात घेऊन एमएमआरडीने जुन्या उड्डाणपुलाशी समांतर नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. (प्रतिनिधी)प्लास्टर तुटून पडले- सहा वर्षांपूर्वी जुन्या उड्डाणपुलाच्या पिलरचे अनेक ठिकाणचे प्लास्टर तुटून पडले होते. त्यावेळी प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर मात्र या पुलाकडे प्रशासनाने सातत्याने कानाडोळा केला आहे. - उड्डाणपुलाच्या खालून लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सतत वर्दळ सुरु असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.