शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार?, आर्थिक अनियमितता झाल्याचा जि. प. उपाध्यक्षांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 01:09 IST

Palghar : आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा असावी, यादृष्टीने कृषी विभागाची रचना करण्यात आली आहे.

पालघर : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत राबवावयाच्या योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी न होता या योजना कागदावरच राबविल्या जात आहेत. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून योजना राबविण्याच्या नावाखाली ३० टक्केची मागणी केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी करून जिल्हा कृषी अधीक्षकांच्या विभागीय चौकशीची मागणी राज्यपालांकडे केली आहे.आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा असावी, यादृष्टीने कृषी विभागाची रचना करण्यात आली आहे. तीन ते चार खेड्यांसाठी एक कृषी साहाय्यकाचे पद देण्यात आले असून, या कृषी साहाय्यकांचे कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबाची सरासरी संख्या ८०० ते ९०० पर्यंत असल्यामुळे शासनाचे कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सुलभ झाले असल्याचा दावा जरी केला जात असला तरी या कृषीविषयक योजनांची योग्यरीत्या अंमलबजावणी जिल्ह्यातल्या कृषी अधीक्षक कार्यालयाकडून होत नसल्याचा आरोप जि.प.चे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी केल्याने कृषी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.जिल्हा अस्तित्वात येऊन सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे कोलमडलेले आर्थिक गणित आजही पूर्वपदावर आल्याचे दिसून येत नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून यांत्रिकीकरण योजना, मागेल त्याला शेततळे, नवीन विहिरी खोदणे, जुन्या विहिरी दुरुस्ती, शेततळे अस्तरीकरण, बियाणे, खते, कीटकनाशके परवाने, रोपवाटिका, हरितगृह, शेडनेट आदी ४२च्या वर योजना राबविल्या जात असून या योजना फक्त कागदावरच दिसत आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणीचे चित्र मात्र निराशाजनक असल्याचे उपाध्यक्ष सांबरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जिल्ह्यातील कृषी योजनांवर खर्च झाला असेल, तर शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात भेट दिल्यावर वस्तुस्थिती समोर येईल. ३० टक्के घेतल्याशिवाय कामे केली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.- नीलेश सांबरे, उपाध्यक्ष, जि. प.पालघर

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय हे राज्यातील कृषीसंदर्भातील महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करीत असते.  लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण करण्याची प्रक्रिया असल्याने गैरव्यवहाराचा प्रश्न उरत नाही. योजना राबविण्याबाबतची सर्व माहिती तालुका स्तरावरून उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- काशिनाथ तरकसे,     जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार