शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डहाणूतील खेड्यापाड्यात महावितरणचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:53 IST

डायमेकिंग व्यवसायावर परिणाम : खा. गावितांच्या आश्वासनाचे काय झाले?

शौकत शेख

डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील सुमारे ६० गावे, खेड्यापाड्यात काळोख पसरला आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरात दिवस-रात्र वीजेच्या तारा तुटणे, ट्रान्स्फॉर्मर फेल होणे, अर्ध्या-अर्ध्या तासाने फ्यूज, डिओ, झंपर उडत असल्याने तासभर देखील वीजपुरवठा सुरळीत रहात नाही. परिणामी, वीजेवर अवलंबून असलेले आणि या भागात घरोघरी चालणारे लघु उद्योग, डायमेकिंग व्यवसाय धोक्यात आले आहेत. चार महिन्यांपासून चिंचणी, वरोर, वानगाव फिडर तसेच बोईसर येथील १३२, १३३ के.व्ही.मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने वीजेची अव्वाच्या सवा बिले पाठवून सक्तीने वसूल करणाºया वीज महावितरण कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप आहे.

डहाणूच्या सुमद्र किनाºयावर वसलेल्या गाव-पाड्यात दिवसातून चार तास वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे. तर रात्रीच्या सुमारास वाºयाची झुळूक आली तरी विजेच्या तारा तुटून पडतात. ग्रामस्थ एकत्र येऊन वायरमनला शोधून आणतात, आणि मग दोन - तीन तासांनी वीजपुरवठा सुरू होतो. परंतु रात्रभर डिओ, फ्यूज उडण्याचे सत्र सुरूच असते, विशेष म्हणजे फ्यूज किंवा डिओ टाकण्याचे काम येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून स्वत:च करीत असतात. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गावात १९६४ मध्ये वीजपुरवठा सुरू झाला. परंतु गेल्या ५५ वर्षात या परिसरात काहीच खास बदल झालेला नाही. जीर्ण, जुनाट विद्युत खांब कमकुवत क्षमतेचा जनित्र, गंजलेल्या विद्युत तारा, गावातील उकिरड्यावर लटकलेले फ्यूज बॉक्स तसेच लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीवरच महावितरण दिवस ढकलत आहे. गेल्या अनेक वर्षात या भागात सातत्याने मोर्चे, आंदोलन करून देखील महावितरण प्रशासन काही सुधारणा करीत नाही.प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीमे २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले खासदार राजेंद्र गावीत यांनी चिंचाणी येथील एका सभेत या परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन ते चार कोटींचा निधी खर्च करून सुधारणा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु अद्याप कोणतीच हालचाल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.डहाणू पश्चिम किनारपट्टीवरील गावात काही ठिकाणी महावितरणची कामे सुरू आहेत. तर अनेक गावातील सुधारणा करण्यासाठी आम्ही पालघर जिल्हा नियोजन समितीकडे काही प्रस्ताव पाठविले आहेत. निश्चितच सुधारणा होऊन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.-प्रताप मचिये,कार्यकारी अभियंता, पालघर महावितरण कंपनी

टॅग्स :dahanu-acदहनूVasai Virarवसई विरार