शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२० : शेतकरी, आदिवासी वर्गाचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:52 IST

शेतकरी, आदिवासी वर्गाचे समाधान करतानाच मंदीत असलेल्या बांधकाम व्यवसायालाही दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे.

पालघर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. विविध समाजघटकांचा विचार करून अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. शेतकरी, आदिवासी वर्गाचे समाधान करतानाच मंदीत असलेल्या बांधकाम व्यवसायालाही दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. आरोग्य सेवेच्या बळकटीकरपणासाठीही शासनाने निधीची तरतूद केली आहे. यामुळे ढासळलेली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुदृढ होईल, अशा विश्वासही व्यक्त होत आहे. पालघर जिल्हावासीयांच्या अर्थसंकल्पासंबंधीच्या या बोलक्या प्रतिक्रिया...महाविकास आघाडीच्या सरकारने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने आमच्या जिल्ह्यातील काहीशी ढासळलेली आरोग्य यंत्रणा सुदृढ होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे. साधी एक्सरे मशीन, इंजेक्शन, औषधेही व्यवस्थित पुरवठा होत नसल्याने आता सर्व यंत्रांनी पूर्ण आणि स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवाही गरीब रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते.- टी.एम. नाईक, ज्येष्ठ नागरिक, पालघरआमदार निधीत १ कोटींची वाढ सरकारने केल्याने आता आमच्या हाती ३ कोटींचा विकासनिधी उपलब्ध होणार आहे. आता ग्रामीण भागातील समाजगृहे, रस्ते आदी अधिक सुविधा देण्यात सोयीचे होईल आणि कौशल्य विकासअंतर्गत तरु णांना प्रशिक्षण देण्याचा अजेंडा मी जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून सरकारने हा अजेंडा स्वीकारल्याने मला विशेष आनंद झाला आहे.- आ. राजेश पाटील, बहुजन विकास आघाडी, बोईसर

>या अर्थसंकल्पात शीघ्र गतीने शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली २२ कोटींची कर्जमाफी व नियमितपणे कर्जफेड करणाऱ्यांस ५० हजार, तर घर खरेदीवर १ टक्के स्टॅम्प ड्युटी कमी या जमेच्या बाजू असून एकंदरीत हा अर्थसंकल्प चांगला आहे.- भगिरथ भोईर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जि. मध्य. सहकारी बँक> सौरऊर्जा प्रकल्प, ठिबक सिंचन या दोन योजना स्वागतार्ह आहेत. मात्र जो सामान्य शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करून रोज शेतात घाम गाळून शासनाचे घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करतो, त्यांची या अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे.- अनिल पाटील,राज्यस्तरीय कृषिभूषण शेतकरी>राज्याला विकासाकडे घेऊन जाणारा आणि शेतकरी तसेच आदिवासींच्या हिताकडे खास लक्ष देऊन अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जनसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.- आनंद ठाकूर,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस>एस.टी.च्या प्रवाशांची गरज ओळखून राज्य सरकारने १६०० नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी ४०० कोटी रु पयांची या अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे आभार! या निर्णयामुळे एस.टी. महामंडळाची सेवा प्रवासाभिमुख होण्यास मदत होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्यांच्या ताफ्याचे योग्य नियोजन करून महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी एस.टी. कर्मचारी मनापासून प्रयत्न करतील आणि पुन्हा एस.टी.ला चांगले दिवस येतील याची खात्री आहे.- कुंदन संखे, प्रमुख सल्लागार, महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार सेना

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट