शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तोरंगणघाटात लुटालुटीला ऊत

By admin | Updated: July 26, 2016 03:04 IST

मोखाडा तालुक्यातील तोरंगणघाटामध्ये वळणावर एका बाजूने चढाव व दुसऱ्या बाजूने उतार असल्याने त्या दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा वेग आपोआप कमी करावा

विक्रमगड : मोखाडा तालुक्यातील तोरंगणघाटामध्ये वळणावर एका बाजूने चढाव व दुसऱ्या बाजूने उतार असल्याने त्या दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा वेग आपोआप कमी करावा लागतो़ तसेच या दरम्यान पाच ते दहा किलो मीटरपर्यंत घनदाट जंगल व आजूबाजू कोणातीही वस्ती अगर घरे नाहीत़ याच संधीचा फायदा घेत आठ दहा जणांची टोळी वाहनांवर दगडफेक करून अथवा ते थांबवून रात्री लुटमार करीत आहे.या टोळीमध्ये दोन तीन महिलांचा समावेश आहे. गाडीला हात करुन थांबविण्याचा प्रयत्न केला जातो़ गाडी थांबली तर लूट करण्याचा त्याचा इरादा असतो,जर गाडी थांबली नाही तर गाडीवर चालकाच्या दिशेने जोराने दगडफेक केली जाते़ त्यामध्ये जर वाहनचालकास दगड लागला तर अपघात घडून गाडी थांबल्यास लूट केली जाते़ हा प्रकार सर्रास चालू असतांनाही प्रशासनाकडून मात्र सुरक्षतेसाठी काहीच उपाय योजना नाही़ हा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर,जव्हार,विक्रमगड असा असून सध्या रात्री या मार्गावरुन येणे धोक्याचे बनले आहे़ त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे़दरम्यानच्या विक्रमगड येथील राहाणारे रविंद्र तुकाराम आयरे व त्यांचे कुंटुंबीय,मित्रमंडळी यांसह नाशिकहून विक्रमगड येथे येत असतांना रात्री ११ वाजताचे सुमारास त्यांचेकडील एर्टीगा तोरंगणघाटामध्ये वळणावर आली असता रस्त्याच्या उजव्या बाजूकडून आठ ते दहा लोकांची टोळी त्यामध्ये दोन तीन महिला दिसत होत्या. त्यामधील दोन तरुण व्यक्ती गाडी थांबविण्याकरीता हात देत गाडी थांबवा गाडी थांबवा याप्रमाणे गाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत होते़ परंतु या ठिकाणी असे प्रकार घडत असल्याची जाणीव रविंद्र आयरे यांना असल्याने त्यांनी गाडी न थांबविता गाडीचा वेग वाढविला व कसेबसे वळण कापले़ गाडी थांबली जात नाही हे पाहून या सर्व लोकांनी कारच्या दिशेने दगडफेक केली. यात काही दुर्दैवी घटना घडली नसली तरी असे प्रकार वाढलेले असून या भागात पोलिसांची गस्त तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. या दगडफेकीनंतर रवींद्र आयरे हे जवळच असलेल्या मोखाडा पोलीस चौकीत गेले असतांना तेथे कुणीही हजर नव्हते. (वार्ताहर)काल आम्ही प्रवास करीत असतांना तोरंगणघाटामध्ये प्रथमच असा प्रकार पाहीला व खूप भयभीत झालो़ आमच्या गाडीवर जोराने दगडफेक करुन हल्ला करण्यात आला,मात्र काचा बंद असल्याने हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही़ मात्र या भागत पोलिसांनी जास्त लक्ष घालून गस्त वाढविण्याची गरज आहे़ कारण ही आठ ते दहा जनांची टोळी येथे सक्रीय असून लुटण्याकरिता ती एखाद्याचा जीव घेऊ शकते़- संदेश राऊत, विक्रमगड