शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लोकसभा निवडणूक: बविआ कुणाला संधी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:02 IST

शिवसेना-भाजपातील अंतर्गत नाराजी पथ्यावर

वसई : बविआचे पालघर जिल्ह्यात तीन आमदार आहेत. वर्ष २००९ मध्ये खासदार बळीराम जाधव पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या मतदारसंघात बविआचे स्थान महत्त्वाचे असले तरी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये जाधव यांचा अ‍ॅड.चिंतामण वनगा यांनी पराभव केला होता. खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर लोकसभेची पोटनिवडणूक घेतली गेली. त्यावेळी बविआ ने पुन्हा जाधव यांनी संधी दिली. त्यावेळी जाधव यांच्या व्यतिरिक्त ही निवडणूक लढवावी अशी मागणी राजेश पाटील, चंद्रकांत खुताडे, परशुराम चावरे, दिनकर वाढण व विष्णू कडव यांनी व्यक्त केली होती.भाजपानेही दिवंगत खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना डावलून कॉग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आयात करून उमेदवारी जाहिर केली होती. त्यामूळे वनगा कुटूंबियांचे नाराज समर्थक श्रीनिवास वनगा यांना मातोश्रीवर घेऊन गेले. एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या सेनेने भाजपाविरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहिर केली. भावनीक आवाहन करत मतदारांना श्रीनिवास वनगा यांना निवडून द्यावे यासाठी खुद्द पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी वसई सह पालघर जिल्हात सभा घेतल्या.डिवचलेल्या भाजपा सरकारनेही साम, दाम, दंड व भेद याचा वापर करायला सुरूवात केली. खूद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपा-यातील गाला नगर येथे जाहिर सभा घेत सेनेसह बविआ पक्षावर व अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यावर खालच्या पातळीवर घसरत टिका केली होती. त्यानंतर आमदार ठाकूर यांनीही फडणवीस यांना चोख उत्तर दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ गावांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी गावे वगळण्याबाबत शपथपत्र सादर करतो असे जाहिर करत मतदारांना गाजराचे आमीष दाखिवले होते.पालघरची लढाई जिंकणारच हा विडा उचललेल्या भाजपाने दोन मुख्यमंत्री, एक केंद्रीय मंत्री व अर्धा डझन आमदारांची फौज पालघरमध्ये पाठवली होती.मात्र. या निवडणूकीचा धुराळा उडालेला असताना बविआने काही अंशी नमते घेतलेले दिसत होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन-चार मोजक्या सभा घेऊन त्यांनी आपल्या परंपरागत मतदार राजाला आवाहन केले. मात्र त्याचा फारसा फायदा मात्र झाला नाही. या निवडणूकीत थेट लढत भाजपा-बविआ पक्षात होणार अशी राजकीय गणित करणाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणूक निकालाच्या दिवशी धक्का बसला. तिसऱ्या क्र मांकावर गुहीत धरलेल्या शिवसेना पक्षाने मुसंडी मारत दुसरे स्थान पटकावत बविआला तिसºया स्थानावर ढकलले होते. भाजपाने ही निवडणूक जिंकत काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार राजेंद्र गावित यांना खासदार बनवत दिल्ली दरबारी बसवलेहोते.पालघर लोकसभा निवडणूक पुन्हा गाजणार!आगामी काळात पालघर लोकसभा निवडणूक पून्हा गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपा-सेना युतीनंतर शिवसेनेसाठी पालघर लोकसभेची जागा सोडली असल्याचे सांगण्यात आले असले तरी अजून याबाबत शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र, जर शिवसेना ही जागा लढवत असेल तर निश्चितच त्यांचा उमेदवार श्रीनिवास वनगा हेच असतील असा अंदाज बांधला जात आहे.बहूजन विकास आघाडी पक्षही या निवडणूकीत पून्हा नशीब अजमावून पाहत असून गेल्या दोन निवडणूकीत माजी खासदार बळीराम जाधव यांना मतदार राजाने नाकारल्यानंतर पक्षश्रेष्ठी पुन्हा जाधव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करतील की, नाही ते येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक