शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज, उधारीच्या जाचामुळे वाढले कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:36 IST

जुलै २०१७ पासून अंगणवाडीत बालकांना देण्यात येणा-या पोषण आहाराची बिले दिली गेलेली नाहीत. त्यामध्ये सततची अनियमितता आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा : जुलै २०१७ पासून अंगणवाडीत बालकांना देण्यात येणा-या पोषण आहाराची बिले दिली गेलेली नाहीत. त्यामध्ये सततची अनियमितता आहे. परिणामी, जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. मागील काही महिने हा आहार पुरवणा-या महिलांनी आपले दागिने गहाण ठेवून, सावकार, बँक तसेच बचत गटांतून कर्ज काढून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. कर्ज आणि उधारीच्या जाचात अडकलेल्या या महिला आता हतबल झाल्या असून त्यांच्या हतबलतेचे थेट परिणाम कुपोषणावर झाले आहेत.शासनस्तरावरील या अनास्थेमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा कुपोषणाच्या विळख्यात सापडला असल्याचे हे चित्र श्रमजीवी संघटनेने पुन्हा एकदा माहितीच्या अधिकारातून जनतेसमोर आणले आहे. डिसेंबर या एका महिन्यात तब्बल ८७८ कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १७६ अतितीव्र कुपोषित, तर ७०२ तीव्र इतकी लक्षणीय वाढ बालकांच्या संख्येमध्ये झाली आहे. १९९२-९३ साली जव्हारमधील वावर-वांगणी भागात घडलेल्या बालमृत्यूंच्या तांडवानंतर त्या काळातील सरकारने या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करून काही धोरणात्मक निर्णय घेतले होते. याच काळात जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा दिलेला होता. मात्र, ठाणे जिल्हा विभाजनानंतर जव्हार, मोखाडा पूर्णपणे दुर्लक्षित झाला आणि त्याचे परिणाम म्हणून वर्षाला सरासरीपेक्षा जास्त बालकांना जीव गमवावा लागला.जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ६७५ अतितीव्र कुपोषित, तर ४७६७ तीव्र कुपोषित असे एकूण ५४४२ बालक असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.धक्कादायक बाब म्हणजे यातील ३६८ अतितीव्र कुपोषित आणि २५३८ तीव्र कुपोषित अशी एकूण २९०६ बालके आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड मतदारसंघातील आहेत. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी तर कुपोषणावर मात करण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ याच त्यांच्या मतदारसंघातून केला, मात्र ही योजनादेखील पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी झालेल्या उपाययोजनेनंतर कुपोषण काही प्रमाणात का होईना नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा येथील जनतेला होती.>मोखाड्यातील विदारक चित्रज्या सागर वाघ या कुपोषित बालकाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र खळबळ माजलेली आहे, त्या कमलवाडी येथेही दुर्दैवाने हीच परिस्थिती आहे. येथे एकूण ३९ लाभार्थी आहेत. या महिलांनाही दागिना गहाण ठेवून पोषण आहार शिजवण्याची नामुश्की ओढवली आहे. डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात तब्बल ८७८ कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मध्ये १७६ अतितीव्र कुपोषित, तर ७२० तीव्र इतकी विदारक स्थिती आहे.>लहानग्यांच्या ताटामध्ये फक्त सुकी खिचडीजव्हारमधील चौथ्याचीच्या अंगणवाडीमध्ये एकूण ९३ लाभार्थी असून पोषण आहार लाभार्थी बालकांची संख्या ४३ आहेत. येथे आहार शिजवण्याची जबाबदारी सुवासिनी बचत गटाकडे असून ती बिले शासनाकडून वेळेवर अदा होत नाहीत. त्यामुळे या महिलांनी उसनवारी करून तसेच मंगळसूत्र गहाण ठेवून पोषण आहाराचा गाडा हाकला आहे. या परिस्थितीमुळे लहानग्यांना गत काही महिन्यांपासून फक्त सुकी खिचडी खावी लागत आहे. याठिकाणी १) अश्विनी राम दुमाडा- ६ वर्षे- ११.५०० किलोग्रॅम,२) यशश्री प्रकाश मुकणे - ६ वर्षे - १४.४०० किलो ग्राम ३) अंकिता शांताराम रामल - ६ वर्षे पूर्ण - ९.१०० किलोग्रॅम, ४) तेजस रामा दुमाडा- २ वर्षे- ७.६०० किलोग्रॅम ही चार तीव्र कुपोषित बालके असल्याची माहिती पुढे येत आहे.>जिल्हा प्रशासनाच्यावतिने आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कुपोषणाची समस्या असणाºया सर्व तालुक्यात सर्व्हेक्षण केले असून त्या अनुशंगाने उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होणार असून रोजगार वाढणार आहे. येत्या मार्च महिन्यात रिझल्ट हाती येतील.- मिलिंद बोरीकर,मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जि.प.