शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

रब्बी लागवड लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 00:58 IST

ढगाळ हवामान : उत्पादनात घट ?

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : तालुक्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने परतीच्या पावसाने ओली झालेली जमीन सुकण्यात अडथळा येत आहे. दरम्यान, वापशाअभावी जमिनीच्या उखळणीची कामे मंदावल्याने पालघर जिल्ह्यातील रब्बी लागवड लांबण्याची शक्यता आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रब्बी लागवडीपूर्व प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटूनही शेतजमिनीला वापसा आलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता जमिनीची उखळणी करण्यात अडचण येत असून लागवड लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालघर जिल्ह्यात किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. 

ही पिके प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते. जमिनीत ओलावा असल्यास मुळकुजव्या आणि अन्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून रोपे रोगग्रस्त होऊन सरासरी उत्पादन घटते. शिवाय उन्हाळी कांदा बी पेरणी उशिरा होऊ शकते. त्यामुळे शेत पीक बाजारात उशिरा आल्यास दर कमी मिळतो.

मागील वर्षी परतीच्या पावसाने हंगाम लांबल्याने वांग्याच्या रोपांची वाढ झाली, मात्र त्याची फळधारणा खूपच कमी प्रमाणात झाली. वालाच्या शेंगांमध्ये दाणा चांगला भरलाही नव्हता. ही स्थिती कमी-अधिक फरकाने सर्वच पिकांबाबत सारखीच झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी लागवड पूर्व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या हंगामातील पिकेपालघर जिल्ह्यात या हंगामात वाल, हरभरा ही कडधान्ये तसेच वांगी, मिरची, टोमॅटो या नगदी पिकासह वेलवर्गीय व मुळा, पालक, पातीचा कांदा इ. भाजीपाल्याची लागवड केली जाते. किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. हे पीक प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते.