शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

रब्बी लागवड लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 00:58 IST

ढगाळ हवामान : उत्पादनात घट ?

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : तालुक्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने परतीच्या पावसाने ओली झालेली जमीन सुकण्यात अडथळा येत आहे. दरम्यान, वापशाअभावी जमिनीच्या उखळणीची कामे मंदावल्याने पालघर जिल्ह्यातील रब्बी लागवड लांबण्याची शक्यता आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रब्बी लागवडीपूर्व प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटूनही शेतजमिनीला वापसा आलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता जमिनीची उखळणी करण्यात अडचण येत असून लागवड लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालघर जिल्ह्यात किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. 

ही पिके प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते. जमिनीत ओलावा असल्यास मुळकुजव्या आणि अन्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून रोपे रोगग्रस्त होऊन सरासरी उत्पादन घटते. शिवाय उन्हाळी कांदा बी पेरणी उशिरा होऊ शकते. त्यामुळे शेत पीक बाजारात उशिरा आल्यास दर कमी मिळतो.

मागील वर्षी परतीच्या पावसाने हंगाम लांबल्याने वांग्याच्या रोपांची वाढ झाली, मात्र त्याची फळधारणा खूपच कमी प्रमाणात झाली. वालाच्या शेंगांमध्ये दाणा चांगला भरलाही नव्हता. ही स्थिती कमी-अधिक फरकाने सर्वच पिकांबाबत सारखीच झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी लागवड पूर्व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या हंगामातील पिकेपालघर जिल्ह्यात या हंगामात वाल, हरभरा ही कडधान्ये तसेच वांगी, मिरची, टोमॅटो या नगदी पिकासह वेलवर्गीय व मुळा, पालक, पातीचा कांदा इ. भाजीपाल्याची लागवड केली जाते. किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. हे पीक प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते.