शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

वसई-विरारला खड्डेमय रस्त्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 03:49 IST

मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही.

विरार : वसई-विरारमधील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही. विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहने चालवताना व चालताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही वर्षांत मनवेलपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे, मात्र आजही येथील नागरिक खड्ड्यांतून मार्गक्रमण करत आहेत.या पावसाळ्यातही विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना नारिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र याबाबत पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे व तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपशहरप्रमुख उदय जाधव व शिवसेना उपविभागप्रमुख प्रवीण आयरे यांनी दिला आहे.जूचंद्र येथील तरुणांची कौतुकास्पद कामगिरीविरार : पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या खड्डेमय रस्त्यांतून वसई-विरारकरांना प्रवास करावा लागत असताना महापालिका प्रशासन खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जी करत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे, मात्र नायगाव पूर्व-जूचंद्र येथील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यांत पडलेले खड्डे बूजवून ज्यूचंद्रकरांना दिलासा दिला आहे.मागील काही महिन्यांपासून नायगाव पूर्वेतील मुख्य रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले होते.या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत होते; परंतु पालिका या रस्त्याची डागडुजी करत नसल्याने जूचंद्र गावातील तरुणांनीच एकत्र येत फावडे व घमेले घेऊन जूचंद्र रेल्वे फाटक ते कर्मवीर महाविद्यालय या परिसरातील खड्डे बुजविले. नेहमीच नागरिकांच्या सातत्यपूर्ण नवनवीन सामाजिक कार्यासाठी ज्यूचंद्र हे गाव ओळखले जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार