शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

वसई-विरारला खड्डेमय रस्त्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 03:49 IST

मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही.

विरार : वसई-विरारमधील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही. विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहने चालवताना व चालताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही वर्षांत मनवेलपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे, मात्र आजही येथील नागरिक खड्ड्यांतून मार्गक्रमण करत आहेत.या पावसाळ्यातही विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना नारिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र याबाबत पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे व तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपशहरप्रमुख उदय जाधव व शिवसेना उपविभागप्रमुख प्रवीण आयरे यांनी दिला आहे.जूचंद्र येथील तरुणांची कौतुकास्पद कामगिरीविरार : पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या खड्डेमय रस्त्यांतून वसई-विरारकरांना प्रवास करावा लागत असताना महापालिका प्रशासन खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जी करत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे, मात्र नायगाव पूर्व-जूचंद्र येथील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यांत पडलेले खड्डे बूजवून ज्यूचंद्रकरांना दिलासा दिला आहे.मागील काही महिन्यांपासून नायगाव पूर्वेतील मुख्य रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले होते.या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत होते; परंतु पालिका या रस्त्याची डागडुजी करत नसल्याने जूचंद्र गावातील तरुणांनीच एकत्र येत फावडे व घमेले घेऊन जूचंद्र रेल्वे फाटक ते कर्मवीर महाविद्यालय या परिसरातील खड्डे बुजविले. नेहमीच नागरिकांच्या सातत्यपूर्ण नवनवीन सामाजिक कार्यासाठी ज्यूचंद्र हे गाव ओळखले जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार