शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

मतांच्या भिकाऱ्यांना चले जाव म्हणूया - फादर दिब्रिटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:21 IST

विश्वासघात करणा-यांविरूद्ध आजपासूनच उग्र आंदोलन सुरू करू या; चंद्रशेखर प्रभूंचे आवाहन

पारोळ : वसई विरार शहर तीन दिवस पाण्याखाली बुडविण्यास येथील महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनीधी जबाबदार असून निवडणुकीत मतांची भीक मागणा-या भिका-यांना चले जाव म्हणण्याचे आवश्यकता आहे, असे प्रतिपादन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीयेथे रविवारी झालेल्या वसई का बुडाली या परिसंवादात केले.ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू हे देखील यावेळी उपस्थित होते. येथील पर्यावरण संवर्धन समिती तर्फे रविवारी संध्याकाळी समाज उन्नती मंडळ हॉल मध्ये आयोजित या परिसंवादास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.जेष्ठ साहित्यिक व हरित वसई चे पुरस्कर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यावेळी म्हणाले की, वसईच्या ज्ञात इतिहासात प्रथमच वसईचा जगाशी संपर्क तुटला, तसेच तब्बल तीन दिवस प्रथमच पूर्व-पश्चिम आणि शहरी-ग्रामीण अशी संपूर्ण वसई पाण्याखाली आली. याची सूक्ष्म कारणमीमांसा होण्यासाठी महापालिकेच्या कारभाराचे कठोर आॅडिट होणे गरजेचे आहे. निसर्गाशी खेळून येथील अनियोजित विकास लादल्या जात आहे. आमचा लढा कुणा व्यक्ती विरुद्ध नाही, तर सामान्यांचे हक्क ओरबाडणाºया प्रवृत्ती विरोधात आहे. पुन्हा वसई बुडू नये, यासाठी शहरास शासनाचे जनतेच्या प्रती प्रतिनिधित्व करणारा आयुक्त आणि लोकांच्या संवेदना जपणारा नगरसेवक हवा आहे. त्याकरता जनसामान्यांनी संघटित होऊन आपल्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. म्हणूनच पुढील काळात आपला प्रतिनिधी जबाबदारीने निवडा. जेव्हा कुणी वाली उरत नाही तेव्हा मवाल्यांचा सुळसुळाट होतो. त्यासाठी आता जागृत होणे गरजेचे आहे.बिल्डर, राजकारणी आणि भ्रष्ट अधिकाºयांच्या अभद्र युतीतून शहरांचे वाटोळे करणारे विकास आराखडे राबवले जात असून, निचºया अभावी दोन-अढीचशे मीमी पाऊसाने तीन दिवस शहर बुडणे ही लाजिरवाणी बाब असल्याचा आरोप करून, चंद्रशेखर प्रभू यावेळी म्हणाले की, ज्यांनी यातना देऊन तुम्हाला रडवले त्यांना रडवण्यासाठी आता गांव आणि शहरातील जनतेने एकत्र येऊन लढा उभारणे आवश्यक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार