शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

विधीमंडळात आला होता तारांकीत प्रश्न, अहवाल तत्कालीन सीईओंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:52 IST

वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी आमदार आनंद ठाकूर यांनी विधीमंडळामध्ये तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला गेला होता.

वसई : वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी आमदार आनंद ठाकूर यांनी विधीमंडळामध्ये तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला गेला होता. तसेच चौदाव्या वित्त आयोगातून व स्वानंद निधीतून लाखो रूपये काढून त्याचे खोटे कागदोपत्री बोगस कंपन्यांना वाटप करण्यात आले. मात्र यात खोटे दस्तावेज बनवत शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप विद्यमान सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणून दिले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी शितल पूंड यांना याबाबत त्वरीत चौकशी करून अहवाल सादर करण्यात सांगितले. मात्र, सात दिवसात तयार होणार अहवाल आठ महिने होऊनही शितल पूंड यांनी सादर केला नसल्यामुळे या शौचालय घोटाळ्यात त्यांचाही सक्र ीय सहभाग असल्याचा आरोप मेहेर यांनी केला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयाांनी शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.प्रत्यक्षात शौचालय कागदोपत्रीच बांधली गेली असतील, तर वसई तालुका हागणदारीमुक्त कसा, असा सवाल वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी केला होता. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी त्यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेविका यांना या प्रकरणात दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्याचा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. परंतु केवळ ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई झाली होती.जानेवारी २०१७ चा अद्यादेश काय म्हणतो...जर ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधींनी गैरव्यवहार आणि अनियमतिता केली तर गटविकास अधिकाºयांनी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे जानेवारी २०१७ रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. जर गटविकास अधिकाºयांनी गुन्हा दाखल केला नसेल तर त्यांना दोषी धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार