शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विधीमंडळात आला होता तारांकीत प्रश्न, अहवाल तत्कालीन सीईओंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:52 IST

वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी आमदार आनंद ठाकूर यांनी विधीमंडळामध्ये तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला गेला होता.

वसई : वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी आमदार आनंद ठाकूर यांनी विधीमंडळामध्ये तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला गेला होता. तसेच चौदाव्या वित्त आयोगातून व स्वानंद निधीतून लाखो रूपये काढून त्याचे खोटे कागदोपत्री बोगस कंपन्यांना वाटप करण्यात आले. मात्र यात खोटे दस्तावेज बनवत शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप विद्यमान सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणून दिले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी शितल पूंड यांना याबाबत त्वरीत चौकशी करून अहवाल सादर करण्यात सांगितले. मात्र, सात दिवसात तयार होणार अहवाल आठ महिने होऊनही शितल पूंड यांनी सादर केला नसल्यामुळे या शौचालय घोटाळ्यात त्यांचाही सक्र ीय सहभाग असल्याचा आरोप मेहेर यांनी केला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयाांनी शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.प्रत्यक्षात शौचालय कागदोपत्रीच बांधली गेली असतील, तर वसई तालुका हागणदारीमुक्त कसा, असा सवाल वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी केला होता. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी त्यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेविका यांना या प्रकरणात दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्याचा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. परंतु केवळ ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई झाली होती.जानेवारी २०१७ चा अद्यादेश काय म्हणतो...जर ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधींनी गैरव्यवहार आणि अनियमतिता केली तर गटविकास अधिकाºयांनी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे जानेवारी २०१७ रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. जर गटविकास अधिकाºयांनी गुन्हा दाखल केला नसेल तर त्यांना दोषी धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार