शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
3
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
4
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
5
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
6
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
7
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
8
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
9
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
10
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
11
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
12
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
13
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
14
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
15
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
16
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
17
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
18
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
19
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
20
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन

२७ गावे वगळण्याचा अहवाल अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 05:29 IST

रवींद्र चव्हाण यांची माहिती : ग्रोथ सेंटरला विरोध झाल्यास अन्यत्र जाण्याची शक्यता

डोंबिवली : ‘केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासाठी मागवलेल्या हरकती-सूचनांचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तो मिळताच मुख्यमंत्री गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेणार आहेत’, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे दिली. ‘आगरी युथ फोरम’ने भरवलेल्या सोळाव्या आगरी महोत्सवाचा समारोप राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, २७ गावे संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, दत्ता वझे, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘हरकती-सूचनांचा अहवाल विचारात न घेता २७ गावे वगळल्यास त्याला न्यायालयात कोणीही आव्हान देऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन हा निर्णय विचारपूर्वक घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री लवकरच त्याबाबतचा निर्णय घेणार आहेत.’‘२७ गावांतील एक हजार ८९ हेक्टर जागेवर कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यासाठी दिलेला एक हजार ८९ कोटींचा निधी पडून आहे. सरकारला ग्रामस्थ व भूमिपुत्रांची जागा घ्यायची नाही. केवळ, त्या जागेवर विकासासाठी परवानगी हवी आहे. या प्रकल्पाद्वारे सेवा क्षेत्रातील ५० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. २७ गावे परिसरातील भूमिपुत्रांनाही त्यात रोजगाराची संधी मिळेल. सरकारला ग्रोथ सेंटर उभारायचेच आहे. मात्र, त्याला ग्रामस्थांनी विरोध केल्यास ग्रोथ सेंटरचा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे विकास आणि रोजगाराच्या संधी विरोधामुळे हुकतील, याचा विचार होणे गरजेचे आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.घरनोंदणीसाठी पुन्हा चर्चा करणारच्२७ गावांतील ग्रामपंचायतीने दिलेल्या मंजुरीच्या आधारे भूमिपुत्रांनी इमारती बांधल्या. त्यातील घरे पागडी व भाडेपद्धतीने दिली आहेत. परंतु, तेथील घरनोंदणी सरकारने बंद केली आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार अडचणीत आला आहे.च्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली आहे. त्यातून काही निष्पन्न झालेले नसले, तरी पुन्हा चर्चा करून नोंदणी सुरू करण्याची मागणी केली जाईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार