शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

एसटीची मिडी बस मोजतेय शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 05:30 IST

आदीवासी, ग्रामीण प्रवाशांची गैरसोय : यांत्रिक बिघाडामुळे कालबाह्यठरवून करणार इतिहासजमा

अनिरुद्ध पाटील

डहाणू : खेडोपाड्यात रस्त्यांचे जाळे पसरल्यानंतर, महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसेस तिथपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. या करिता मिडी बस फायदेशीर ठरतात. मात्र या आगाराकडे केवळ दोनच मिडी बस उपलब्ध असून यांत्रिकदृष्ट्या त्या कार्यक्षम नसल्याने अल्पावधीतच त्यांचा गाशा गुंडाळला जाऊन त्या इतिहासजमा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

या आगाराअंतर्गत डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. डहाणूत ८५ ग्रामपंचायती असून एकूण दिडशेपेक्षा अधिक गावं आहेत. मागील दशका पेक्षा आज खेडोपाड्यात रस्त्यांचे जाळे निर्माण झालेले असून लोकसंख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पाड्यापर्यंत बस सेवा मिळण्यासह, त्या दिवसातील ठराविक अंतराने उपलब्ध व्हाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. या संदर्भातील प्रस्तावही पाठविलेले आहेत. मात्र डहाणू नगरपालिका क्षेत्र आणि लगतची गावे यामध्ये ही सेवा पुरविण्यात या आगाराला अपयश आले आहे. त्यामुळे रिक्षातून आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबलेले असतांना अधिकचे भाडे भरून नागरिकांना प्रवास करावा लागतो. डहाणूपर्यंत लोकल सेवा आल्यानंतर परगावतील प्रवाशांची संख्या वाढली आहे. या मध्ये विद्यार्थी, शासकीय नोकरीतील कर्मचारी आणि न्यायालय, उप विभागीय दंडाधिकारी, यूपीए विभागीय पोलीस अधिकारी, उप वन संरक्षक कार्यालय आणि आगर येथील उप जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी पोहचण्यासाठी दिवसभर प्रवाशी ठराविक वेळेने येत असतात.शिवाय विकेंड आणि पर्यटन हंगामात रहदारी वाढती असते. मात्र, सेवे अभावी सर्वांचीच गैरसोय होते. तर लालपरी म्हणून ओळखली जाणारी परिवर्तन गाडी ४४ आसनी असून एवढे प्रवासी न मिळाल्यास नफ्या पेक्षा खर्च अधिक होत असल्याने त्या चालविण्या पेक्षा मिडी बसेस फायद्याच्या ठरतात. परंतु येथे केवळ दोनच मिडी उपलब्ध आहेत. त्या ही यांत्रिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत नाहीत. प्रवासादरम्यान त्यांच्यात सतत बिघाड होत असून काळा धूर फेकून त्या प्रदूषण निर्माण करीत आहेत. तर या पद्धतीच्या बसेस शेवटच्या घटिका मोजत असून पालघर विभागात पालघर आणि बोईसर आगारात प्रत्येकी चार आणि उर्वरित दोन डहाणूला आहेत. त्या कालबाह्य ठरल्याने हा प्रोजेक्ट बासनात गुंडाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.डहाणू आगाराच्या आर्थिक तोट्याचे असे आहे गणितया आगाराचे प्रतिदिन १३ हजार किमी प्रवासाचे सरासरी लक्ष्य आहे. मात्र, ते साधण्यास अपयश येत आहे. त्यामुळेच सात लाखांचे अपेक्षित उत्पन्न असतांना ३ लक्ष ७७हजार एवढेच उत्पन्न हाती येते. प्रती किमी उत्पन्न २८ रु पये ८३ पैसे इतके तर भारमान ५५ एवढे आहे. या आगाराच्या ताफ्यात ३३ परिवर्तन गाड्या, १४ मानव विकास आणि फक्त २ मिडी बसेस आहेत. दरम्यान, मिडीची असलेली कमतरताच या आगाराला आर्थिक तोट्याकडे ढकलत असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार