शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

जिल्ह्यात भूमाफियांची दादागिरी

By admin | Updated: July 28, 2015 23:33 IST

माहिम ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतू पाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारत संकुल उभारताना नैसर्गिक नाले तसेच ओढे बंद केल्याने ९० ते ९५ आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी

पालघर : माहिम ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतू पाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारत संकुल उभारताना नैसर्गिक नाले तसेच ओढे बंद केल्याने ९० ते ९५ आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी शिरून अन्नधान्य, विद्यार्थ्यांची पुस्तके, कपडे, भिजून मोठे नुकसान झाले आहे. नियम व कायदे पायदळी तुडवून भूमाफीयांची दादागिरी सुरू असून बिल्डरांच्या विरोधात तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांसह आदिवासी एकता परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बिल्डरांवर कारवाईची मागणी केली.पालघर शहरात गोठणपुर, वीरेंद्रनगर, डुंगीपाडा, घोलवीरा, चिंतूपाडा, माहिमरोड इ. भागात काही बिल्डरांनी नैसर्गिक नाले बंद करून अथवा लांबी कमी करून नैसर्गिक प्रवाह बदलल्याने या भागातील गरीबांच्या अनेक घरात ३ ते ४ फुट पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. यावेळी पालघर अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने ४० ते ४५ लोकांची सुखरूप सुटका केली होती. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावरील चिंतूपाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या एका बिल्डराने अनेक वर्षापूर्वीचा वहिवाटीचा रस्ता व तेथून वाहणारे नैसर्गिक नाले व ओढे बंद केल्याने पाण्याचा निचरा न होता अनेक घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते व पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक संकटावर मात करून लहान मुलांचे जीव वाचविण्यात लोकांना यश आले. लक्ष्मी कॉम्प्लेक्सला स्थानिकांचा विरोध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बिल्डरने आपले काम सुरूच ठेवले असून प्रशासन कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी एकता परिषदेचे गोपिनाथ चाकर, शकुंतला तांडेल, किर्ती वरठा, अमोल रावते यांनी कारवाईची मागणी केली. (वार्ताहर)