शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जिल्ह्यात भूमाफियांची दादागिरी

By admin | Updated: July 28, 2015 23:33 IST

माहिम ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतू पाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारत संकुल उभारताना नैसर्गिक नाले तसेच ओढे बंद केल्याने ९० ते ९५ आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी

पालघर : माहिम ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतू पाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारत संकुल उभारताना नैसर्गिक नाले तसेच ओढे बंद केल्याने ९० ते ९५ आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी शिरून अन्नधान्य, विद्यार्थ्यांची पुस्तके, कपडे, भिजून मोठे नुकसान झाले आहे. नियम व कायदे पायदळी तुडवून भूमाफीयांची दादागिरी सुरू असून बिल्डरांच्या विरोधात तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांसह आदिवासी एकता परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बिल्डरांवर कारवाईची मागणी केली.पालघर शहरात गोठणपुर, वीरेंद्रनगर, डुंगीपाडा, घोलवीरा, चिंतूपाडा, माहिमरोड इ. भागात काही बिल्डरांनी नैसर्गिक नाले बंद करून अथवा लांबी कमी करून नैसर्गिक प्रवाह बदलल्याने या भागातील गरीबांच्या अनेक घरात ३ ते ४ फुट पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. यावेळी पालघर अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने ४० ते ४५ लोकांची सुखरूप सुटका केली होती. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावरील चिंतूपाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या एका बिल्डराने अनेक वर्षापूर्वीचा वहिवाटीचा रस्ता व तेथून वाहणारे नैसर्गिक नाले व ओढे बंद केल्याने पाण्याचा निचरा न होता अनेक घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते व पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक संकटावर मात करून लहान मुलांचे जीव वाचविण्यात लोकांना यश आले. लक्ष्मी कॉम्प्लेक्सला स्थानिकांचा विरोध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बिल्डरने आपले काम सुरूच ठेवले असून प्रशासन कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी एकता परिषदेचे गोपिनाथ चाकर, शकुंतला तांडेल, किर्ती वरठा, अमोल रावते यांनी कारवाईची मागणी केली. (वार्ताहर)