शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

कुडूस-चिंचघर रस्त्याचे काम निकृष्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:39 IST

नियमानुसार साहित्य वापरले नसल्याचा आरोप : मुदत संपल्यानंतरही काम अजून अपूर्णच

वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंंंचघर-देवघर-गौरापूर या रस्त्याच्या कामाला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. मुदत संपूनही काम अपूर्ण आहे. अजूनही काम कासवगतीने सुरू असून या कामात नियमाप्रमाणे साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे.

१२ कि.मी. लांबीचा हा रस्ता असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम सांगले कन्स्ट्रक्शन नाशिक यांना देण्यात आले आहे. परंतु या ठेकेदार एजन्सीने हे काम वाड्यातील २ सबठेकेदारांना दिले आहे. चिंचघरपासून पुढे काम अर्धवट असून मोऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत. या रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. मोºयांसाठी वापरल्या जाणाºया पाईपला दोन्ही बाजूनी क्रॉसिंग करून पाईप टाकला पाहिजे, परंतु तसे होत नाही. त्यामुळे रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू झाल्यावर पाईप फुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे पाईप टाकण्यापूर्वी त्याखाली काँक्रिटीकरण झाले पाहिजे ते ठरलेल्या जाडीचे होत नाही.एकंदर अंदाजपत्रकानुसार काम केले जात नसल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे. या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्याच्या प्रती अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.या रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याने ठेकेदाराला दंड आकारण्यात आला असून अपूर्ण राहिलेले काम जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.-विनोद घोलप, शाखा अभियंतामुख्यमंत्री ग्रामसडक योजना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार