शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कुडूस-गौरापूरचा रस्ता दर्जाहीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 03:06 IST

सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम कासवाच्या गतीने सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम कासवाच्या गतीने सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. अत्यंत महत्वाच्या सध्या व वाहतूक कोंंडी च्या बनलेल्या या रस्त्याचे बोगस काम कारणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाव्दारे तहसिलदार दिनेश कुºहाडे यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी चालढकल झाल्याच २० मार्च रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी लांबीचा रस्ता असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम सांगले कंस्ट्रक्शन नाशिक यांना देण्यात आले आहे. परंतु या ठेकेदार एजन्सीने हे काम वाडयातील दोन सब ठेकेदारांन दिले आहे. त्यातून कुडूस ते चिंचघर पर्यंतचा रस्ता क्राँक्रीटकरण तर चिंचघर ते गौरापूर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण होणार आहे.ते काम सध्या सुरू असून त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा कुणबी सेनेच्या पदाधिकाºयांचा आरोप आहे. या रस्त्यावर लॅब असणे आवश्यक आहे. ती कुठेच दिसत नाही. मुरूम चाळण्या घेतल्या जात नाहीत. मोºयांसाठी वापरले जाणाºया पाईपाला दोन्ही बाजुंनी केसिंग करून पाईप टाकला पाहिजे परंतु तसे होत नाही. त्यामुळे रस्त्यावर दाब आल्यावर पाईप फूटण्याची शक्यता आहे.पाईप अंथरण्यापूर्वी क्राँक्रीट झाले पाहिजे ते ठरलेल्या जाडीचे होत नाही. जे खडीकरण केले आहे ते बरोबर दाबले गेले नसल्याने रस्ता उखडला जात आहे. झालेल्या मोºयांवर कुठेही पाणी मारलेले दिसत नाही. ओल्या कामांवर गोणपाट अंथरणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी ते दिसत नाही. गिरीट पावडर वापराला निर्बंध असतांना खुलेआम गिरीट पाववडर वापरली जात आहे. एकंदर अंदाज पत्रकानुसार काम केले जात नसल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे.हर्षद गंधे म्हणतात, काम अपूर्ण मात्र दर्जा उत्तमया संदर्भात ठेकेदार हर्षद गंधे यांच्यासाठी संपर्क साधला असता कामाचा दर्जा उत्तम असून अजून काम पूर्णच झाले नसल्याने दर्जा बाबत प्रश्नच उपस्थित केला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर स्थापत्य सहाय्यक अभियंता पृथ्वीराज जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता या कामाला नागरिकांच्या विरोधामुळे विलंब होत आहे. मात्र, काम नियमाप्रमाणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.>कोंढला-खैर रस्त्याचे : साडेचार कोटी पाण्यातयाच ठेकेदाराने कोंढला-खैरे या रस्त्याचे काम मे महिन्यात केले होते तो रस्ता जून मध्ये पूर्णपणे उखडला गेल्याने शासनाचे ४ कोटी ३५ लाख पाण्यात गेले आहेत. ते ही काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील होते. त्याकामात शाखा अभियंता विनोद घोलप हे पार्टनर असल्याचे बोलले जात होते. याही कामात ते ठेकेदारांसोबत असल्याने याही रस्त्याचा पूरता बोजवारा उडाला आहे. या प्रकरणी उपोषण करण्याचा इशारा कुणबी सेनेचे उपतालुका प्रमुख प्रदिप हरड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्याच्या प्रती अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.