शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

किसान आक्रोश यात्रा ५ डिसेंबरला, विश्वनाथ पाटील यांचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:38 IST

शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान आक्रोश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

वाडा : शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान आक्रोश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तिचा शुभारंभ ५ डिसेंबर रोजी विक्र मगड येथे होऊन ८ डिसेंबरला पहिल्या टप्प्याचा शेवट मुरबाड येथे होणार आहे. कुणबी सेनेने या आक्रोश यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे.५ डिसेंबरला वाडा तालुक्यातील खानिवली येथे सायंकाळी ४ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी वाडा येथे १० वाजता, कुडूस येथे १२ वाजता, आबिटघर येथे २ तर सोनाळे येथे ५ वाजता सभांचे आयोजन केले आहे. त्यानंतर ७ व ८ डिसेंबर रोजी शहापूर व मुरबाड या तालुक्यांत आक्र ोश यात्रा जाणार असून मुरबाड येथे पहिल्या टप्प्याचा शेवट होणार आहे.या आक्रोश यात्रेत मोठ्या संख्येने शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुणबी सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, सरचिटणीस नितीन पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.>आक्र ोश यात्रेच्या मागण्यासंपूर्ण कोकणात दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट एकरी तीस हजार रु पये नुकसान भरपाई द्या, शेतक-यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, धान्य खरेदी केंद्रे सुरू करून भाताला क्विंटल मागे ३५००/- रुपये दर द्या, पिंजाळ व गारगाई या धरणांतील ५० टक्के पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी द्या, विविध प्रकल्पांसाठी शेतक-यांच्या जमिन संपादन करताना दलाल, शासकीय अधिका-यांच्या मदतीने शेतक-यांची चाललेली लूट थांबवून थेट व्यवहार करावा. ३५ सेक्शन, वनसंज्ञा, इको सेन्सेटिव्ह झोन इत्यादी जाचक कायदे रद्द करा. दगड, वीट, रेती मातीच्या उत्खननावर घातलेली बंदी उठवा, ओबीसी समाजाला मंजूरकेलेले २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, तोट्यात चाललेली भातशेतीची लागवड रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा.