शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपांची पूर्तता होत नसल्याने केडीएमसीचे होतेय नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:42 IST

रक्कम वसूल कोण करणार? : शिवसेना नगरसेवकाने वेधले लक्ष

कल्याण : केडीएमसीच्या लेखापरीक्षण विभागाने आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त आक्षेप नोंदवले असून, त्यानुसार वसूलपात्र रक्कम ही कोट्यवधींच्या घरात आहे. १९८३ पासूनच्या लेखापरीक्षणातील सगळे आक्षेप पाहता वसूलपात्र रकमेचा आकडा चार अब्जांपेक्षा मोठा आहे. मात्र, त्याची पूर्तता केली जात नसल्याने महापालिकेचे नुकसान करणाऱ्यांकडून पैसा वसूल जात नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.म्हात्रे म्हणाले, महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून योग्य प्रकारे काम केले जात नाही. यापूर्वी दिनेश थोरात यांनी याबाबतचा सगळा अहवाल तयार केला होता. मात्र, त्या अहवालाची अंमलबजावणीच अद्यापपर्यंत केलेली नाही. नव्याने आलेल्या लेखा अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाविषयी स्वारस्य नाही. त्यामुळे लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपांची पूर्तता कोण करणार व वसूलपात्र रक्कम कोण वसूल करणार, याविषयी प्रश्नचिन्ह आहे.महापालिकेत ई-टेंडरिंग पद्धतीने निविदा काढल्या जातात. तरीही, अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने टेंडर फिक्सिंग केले जाते. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. परिणामी, २०११ पासून महापालिकेचे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. ठरावीक कंत्राटदारांनाच काम मिळते. निकोप स्पर्धा होत नसल्यामुळे कंत्राटदारांकडून कामाचा दर्जा राखला जात नाही, असे ते म्हणाले.सध्या महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा मुद्दा गाजत आहे. १७ कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम असून ७० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात खड्डे कायम आहेत. त्यामुळे २०११ पासून टेंडर फिक्सिंग व रस्त्याची निकृष्ट कामे करणारे व खड्डे न बुजविता बिले लाटणाºया कंत्राटदारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. तसेच दंड आकारून ही बांधकामे नियमित केली जात नाही. बेकायदा बांधकामाला अधीन राहून कर लावल्यास महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटींचा महसूल जमा होऊ शकतो, असे म्हात्रे यांनी सांगितले.महापालिकेने आपल्या हद्दीतील बिल्डरांना ओपन लॅण्डच्या करदरात सूट दिली. मात्र, त्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. महापालिका हद्दीतील बिल्डर चोर असल्याचा खळबळजनक आरोप बुधवारी कर आढावा बैठकीत म्हात्रे यांनी केला होता. त्यामुळे स्थायी सदस्य व सभापती यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तसेच काही सदस्यांनी बिल्डरांना महापालिका सोयीसुविधा देत नाही. त्यामुळे ते चोर आहेत, असा आरोप करणे कितपत योग्य आहे, याकडे लक्ष वेधले.पाणीचोर मोकाटबेकायदा नळजोडण्या नियमित केल्या जात नाहीत. त्यामुळे पाणीचोर फुकट पाणी पित आहेत. तर, दुसरीकडे पाणीबिल व मालमत्ताकर भरणाºयांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे.बेकायदा बांधकामधारक पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी करत आहेत, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. पाणीचोरांच्या विरोधात कारवाई होत नसल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका