शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:48 IST

मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही.

मोखाडा : मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात खºया अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. या परिस्थितीमुळे इतर समाजापेक्षा वेगळी जीवनशैली जगणाºया हा कातकरी समाज खºया अर्थाने आजही स्थलांतरीत जीवन जगत आहे.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरु झाल्या खºया परंतु त्यांची अमलबजावणी नेमकी कुठे झाली हा संशोधनाचा विषय आहे. आजही हजारो कातकरी बांधव रोजगारासाठी दिवाळी संपताच तालुक्या बाहेर, जिल्हाबाहेर वीटभट्टी, बांधकाम व्यावसायिक व मजुरीसाठी स्थलांतरित झाले असल्याचे वास्तव आहे. मूळ निवासी असणाºया या समाजाची मालकीची जमीन नाही. स्थलांतरीत जीवनशैलीमुळे शिक्षणात पडणारा खंड, वाढती व्यसनाधीनता, वाढते कुपोषण, बालविवाह आदी समस्यांचा डोंगर अशी स्थिती असल्याची माहिती हिरवे येथील अशोक पवार यांनी लोकमतला सांगितले.स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने हा समाज दरवर्षी स्थलांरीत गावात स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्याने शिवाय उदरिनर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने जव्हार, मोखाडा, विक्र मगड येथील कातकरी बांधवाना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. रोजगार हमीची कामे कायम स्वरूपी नसल्यामुळे हा समाज या रोजगार हमी योजने पासून दूरच आहे.शिक्षणाची भट्टीपेटलीच नाहीकायम स्थलांतरीत असणाºया या समाजातील मुलेही शिक्षणापासून कायम वंचित राहिले आहेत जूनमध्ये गावातील शाळेत जाणारी मुले दिवाळीनंतर आई वडिलांसोबत वीटभट्टीवर जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची नेहमीच परवड होत असते. यामुळे शासनाने स्थलांतरित मुलांसाठी हंगामी वस्तीशाळा सुरु केल्या होत्या मात्र, या शाळांमध्ये गैरव्यवहार झाल्याने ह्या शाळा देखील अल्पायुषी ठरल्या. त्यामुळे कातकºयांची ही मुल शिक्षणापासून वंचित राहिली.ढोर मेहनत अन तुटपुंजी कमाईवीटभटीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापने, भट्टी रचणे आदि कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात.याबदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्या पुरते पैसे मिळतात. व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोर मेहनत अन् कमाई तुटपुजी अशी स्थिती आहे.गेल्या शतकानू शतके आमचा कातकरी समाज हा वंचित व उपेक्षित राहिला आहे. दिवाळीचा सन संपताच येथील कातकरी बांधव रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला आहे .- अशोक पवार, हिरवे गाव

टॅग्स :Vasai Virarवसई विरार