शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:48 IST

मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही.

मोखाडा : मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात खºया अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. या परिस्थितीमुळे इतर समाजापेक्षा वेगळी जीवनशैली जगणाºया हा कातकरी समाज खºया अर्थाने आजही स्थलांतरीत जीवन जगत आहे.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरु झाल्या खºया परंतु त्यांची अमलबजावणी नेमकी कुठे झाली हा संशोधनाचा विषय आहे. आजही हजारो कातकरी बांधव रोजगारासाठी दिवाळी संपताच तालुक्या बाहेर, जिल्हाबाहेर वीटभट्टी, बांधकाम व्यावसायिक व मजुरीसाठी स्थलांतरित झाले असल्याचे वास्तव आहे. मूळ निवासी असणाºया या समाजाची मालकीची जमीन नाही. स्थलांतरीत जीवनशैलीमुळे शिक्षणात पडणारा खंड, वाढती व्यसनाधीनता, वाढते कुपोषण, बालविवाह आदी समस्यांचा डोंगर अशी स्थिती असल्याची माहिती हिरवे येथील अशोक पवार यांनी लोकमतला सांगितले.स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने हा समाज दरवर्षी स्थलांरीत गावात स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्याने शिवाय उदरिनर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने जव्हार, मोखाडा, विक्र मगड येथील कातकरी बांधवाना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. रोजगार हमीची कामे कायम स्वरूपी नसल्यामुळे हा समाज या रोजगार हमी योजने पासून दूरच आहे.शिक्षणाची भट्टीपेटलीच नाहीकायम स्थलांतरीत असणाºया या समाजातील मुलेही शिक्षणापासून कायम वंचित राहिले आहेत जूनमध्ये गावातील शाळेत जाणारी मुले दिवाळीनंतर आई वडिलांसोबत वीटभट्टीवर जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची नेहमीच परवड होत असते. यामुळे शासनाने स्थलांतरित मुलांसाठी हंगामी वस्तीशाळा सुरु केल्या होत्या मात्र, या शाळांमध्ये गैरव्यवहार झाल्याने ह्या शाळा देखील अल्पायुषी ठरल्या. त्यामुळे कातकºयांची ही मुल शिक्षणापासून वंचित राहिली.ढोर मेहनत अन तुटपुंजी कमाईवीटभटीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापने, भट्टी रचणे आदि कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात.याबदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्या पुरते पैसे मिळतात. व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोर मेहनत अन् कमाई तुटपुजी अशी स्थिती आहे.गेल्या शतकानू शतके आमचा कातकरी समाज हा वंचित व उपेक्षित राहिला आहे. दिवाळीचा सन संपताच येथील कातकरी बांधव रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला आहे .- अशोक पवार, हिरवे गाव

टॅग्स :Vasai Virarवसई विरार