शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:48 IST

मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही.

मोखाडा : मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात खºया अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. या परिस्थितीमुळे इतर समाजापेक्षा वेगळी जीवनशैली जगणाºया हा कातकरी समाज खºया अर्थाने आजही स्थलांतरीत जीवन जगत आहे.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरु झाल्या खºया परंतु त्यांची अमलबजावणी नेमकी कुठे झाली हा संशोधनाचा विषय आहे. आजही हजारो कातकरी बांधव रोजगारासाठी दिवाळी संपताच तालुक्या बाहेर, जिल्हाबाहेर वीटभट्टी, बांधकाम व्यावसायिक व मजुरीसाठी स्थलांतरित झाले असल्याचे वास्तव आहे. मूळ निवासी असणाºया या समाजाची मालकीची जमीन नाही. स्थलांतरीत जीवनशैलीमुळे शिक्षणात पडणारा खंड, वाढती व्यसनाधीनता, वाढते कुपोषण, बालविवाह आदी समस्यांचा डोंगर अशी स्थिती असल्याची माहिती हिरवे येथील अशोक पवार यांनी लोकमतला सांगितले.स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने हा समाज दरवर्षी स्थलांरीत गावात स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्याने शिवाय उदरिनर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने जव्हार, मोखाडा, विक्र मगड येथील कातकरी बांधवाना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. रोजगार हमीची कामे कायम स्वरूपी नसल्यामुळे हा समाज या रोजगार हमी योजने पासून दूरच आहे.शिक्षणाची भट्टीपेटलीच नाहीकायम स्थलांतरीत असणाºया या समाजातील मुलेही शिक्षणापासून कायम वंचित राहिले आहेत जूनमध्ये गावातील शाळेत जाणारी मुले दिवाळीनंतर आई वडिलांसोबत वीटभट्टीवर जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची नेहमीच परवड होत असते. यामुळे शासनाने स्थलांतरित मुलांसाठी हंगामी वस्तीशाळा सुरु केल्या होत्या मात्र, या शाळांमध्ये गैरव्यवहार झाल्याने ह्या शाळा देखील अल्पायुषी ठरल्या. त्यामुळे कातकºयांची ही मुल शिक्षणापासून वंचित राहिली.ढोर मेहनत अन तुटपुंजी कमाईवीटभटीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापने, भट्टी रचणे आदि कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात.याबदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्या पुरते पैसे मिळतात. व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोर मेहनत अन् कमाई तुटपुजी अशी स्थिती आहे.गेल्या शतकानू शतके आमचा कातकरी समाज हा वंचित व उपेक्षित राहिला आहे. दिवाळीचा सन संपताच येथील कातकरी बांधव रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला आहे .- अशोक पवार, हिरवे गाव

टॅग्स :Vasai Virarवसई विरार