शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

कातकरी-आदिवासींचे न्यायासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:22 IST

रेशनकार्ड तत्काळ द्या : श्रमजीवी संघटनेचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे

पालघर : तहसीलदार कार्यालयात कातकरी, आदिवासी कुटुंबांच्या दाखल केलेल्या २,१९४ रेशन कार्डांच्या अर्जापैकी ५९८ अर्ज मागील अनेक महिन्यांपासून शिल्लक असल्याने तत्काळ रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी सोमवारी श्रमजिवी संघटनेने तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन पुकारले.

पालघर तालुक्यातील अनेक गावांतील आदिवासी, कातकरी कुटुंबीयांकडे स्वतःची रेशन कार्ड नसल्याने त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपाशी राहण्याची पाळी उद्भवली होती. शासन पातळीवरून पाठपुरावा करूनही श्रमजिवीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, श्रमजिवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत, शासनाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आल्यावर आदिवासी विकास विभागाच्या सचिव आणि पालघर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी अहिरे यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दोन महिन्यात रेशन कार्ड आणि धान्याचे वितरण करू, असे सांगितल्याची माहिती श्रमजिवीचे तालुकाध्यक्ष दिनेश पवार यांनी दिली, परंतु अनेक कुटुंबीयांना आजही रेशन कार्ड मिळाली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाकडे नवीन रेशन कार्ड मिळविण्यासाठी दाखल केलेल्या २१ हजार ९४१ अर्जापैकी १ हजार ५९६ रेशन कार्ड देण्यात आली असून, उर्वरित ५९८ कुटुंबांना रेशन कार्ड देण्याबाबत आश्वस्त करूनही कार्ड दिली जात नसल्याचे तालुकाध्यक्ष दिनेश पवार यांचे म्हणणे आहे. मात्र, पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या रेशन कार्डांपैकी ८० टक्के रेशन कार्ड संघटनेने दिलेल्या अर्जातून देण्यात आली आहेत. संघटनेने तहसीलदार कार्यालयाला ५ जानेवारी रोजी पत्र देऊन दोन दिवसांच्या आत ८ तारखेपर्यंत रेशन कार्ड न मिळाल्यास ११ तारखेला आंदोलनाचा इशारा दिला होता. रेशन कार्ड बनविण्याचे काम सुरू असताना अल्प कालावधीत सर्व रेशन कार्ड शक्य नसल्याने शेवटी सोमवारी आंदोलनादरम्यान बनविण्यात आलेली सुमारे २०० रेशन कार्ड नायब तहसीलदार केशव तरंगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर