शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

कातकरी-आदिवासींचे न्यायासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:22 IST

रेशनकार्ड तत्काळ द्या : श्रमजीवी संघटनेचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे

पालघर : तहसीलदार कार्यालयात कातकरी, आदिवासी कुटुंबांच्या दाखल केलेल्या २,१९४ रेशन कार्डांच्या अर्जापैकी ५९८ अर्ज मागील अनेक महिन्यांपासून शिल्लक असल्याने तत्काळ रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी सोमवारी श्रमजिवी संघटनेने तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन पुकारले.

पालघर तालुक्यातील अनेक गावांतील आदिवासी, कातकरी कुटुंबीयांकडे स्वतःची रेशन कार्ड नसल्याने त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपाशी राहण्याची पाळी उद्भवली होती. शासन पातळीवरून पाठपुरावा करूनही श्रमजिवीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, श्रमजिवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत, शासनाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आल्यावर आदिवासी विकास विभागाच्या सचिव आणि पालघर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी अहिरे यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दोन महिन्यात रेशन कार्ड आणि धान्याचे वितरण करू, असे सांगितल्याची माहिती श्रमजिवीचे तालुकाध्यक्ष दिनेश पवार यांनी दिली, परंतु अनेक कुटुंबीयांना आजही रेशन कार्ड मिळाली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाकडे नवीन रेशन कार्ड मिळविण्यासाठी दाखल केलेल्या २१ हजार ९४१ अर्जापैकी १ हजार ५९६ रेशन कार्ड देण्यात आली असून, उर्वरित ५९८ कुटुंबांना रेशन कार्ड देण्याबाबत आश्वस्त करूनही कार्ड दिली जात नसल्याचे तालुकाध्यक्ष दिनेश पवार यांचे म्हणणे आहे. मात्र, पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या रेशन कार्डांपैकी ८० टक्के रेशन कार्ड संघटनेने दिलेल्या अर्जातून देण्यात आली आहेत. संघटनेने तहसीलदार कार्यालयाला ५ जानेवारी रोजी पत्र देऊन दोन दिवसांच्या आत ८ तारखेपर्यंत रेशन कार्ड न मिळाल्यास ११ तारखेला आंदोलनाचा इशारा दिला होता. रेशन कार्ड बनविण्याचे काम सुरू असताना अल्प कालावधीत सर्व रेशन कार्ड शक्य नसल्याने शेवटी सोमवारी आंदोलनादरम्यान बनविण्यात आलेली सुमारे २०० रेशन कार्ड नायब तहसीलदार केशव तरंगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर