शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नोकरी न करता कल्पेश पाटील या तरूणाने घेतली यशस्वी झेप; वर्षभरात झाला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 23:33 IST

६0 एकर जागेत लागवड, अ‍ॅडव्हांटेज कोकण परिषदेकडून सत्कार

शशिकांत ठाकूर

कासा : कासा जवळील कल्पेश पाटील या तरुणाने आधुनिक शेतीतून झेंडूच्या फुलांची लागवड करून मोठा विकास केला आहे. या व्यवसायात त्याला वर्षाकाठी १८ ते २० लाखाचे उत्पन्न मिळते.

आंबेदा गावातील कल्पेश दतू पाटील या कुणबी समाजातील तरुणाने नोकरी व्यवसाय कडे न वळता पारंपारिक पध्दतीची शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली. त्याने फुलांची मागणी लक्षात घेऊन फुल शेती केली. सुरुवातीला त्याने आपल्या वडिलोपार्जित 3 एकर जमिनीत झेंडूची लागवड केली. या व्यवसायात त्यांना चांगले उत्पन्न मिळाले हे लक्षात घेऊन त्याने फुलशेती व्यवसाय वाढविण्याचा निश्चय केला. व त्यांनी कासा, वाघाडी,बर्हाणपूर, आंबेदा, धामटने, चिंचपाडा, धरमपूर, भवाडी आशा आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी भाडे तत्वावर घेऊन ६0 एकर जमिनीवर झेंडूची लागवड केली आहे. या मध्ये कलकत्ता आॅरेंज, येल्लो, गोल्ड स्पॉट टू, आरोगोल्ड, अप्सरा, येल्लो अश्वगंधा या जातीच्या रोपांची लागवड करतात.

मागणी लक्षात घेऊन झेंडूच्या रोपांची लागवड आॅगस्ट ते जानेवारी महिन्यात चार ते पाच टप्प्यात आपल्याकडे भाड्याने घेतलेल्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये कल्पेश करत असून मे महिन्यापर्यंत हा सिझन चालतो. ही झेंडूची फुले दादर, कल्याण, पनवेल या सारख्या मोठ्या बाजारपेठे बरोबरच वापी, सुरत, बडोदा अशी मागणी असेल त्या बाजार पेठेत पाठवली जातात

गेल्या १० वर्षापासून कल्पेश हे फुल शेती करत असून. या व्यवसाय मध्ये त्याचे वडील व दोन भाऊ पुंडलिक आणि विजय त्यांना मदत करतात व मागील वर्षी कल्पेश यांनी 60 एकर जमिनीवर झेंडूची फुल शेती केली असून या मध्ये त्यांना 350 टन फुलांचे उत्पादन मिळाले व साधारण 30 ते 50 रु किलो भावाने विक्रीतून 60 लाखांची उलाढाल झाली असून 18 ते 20 लाखांचे उत्पन्न मिळाले. ही त्याची फुल शेती येथील तरु णांना प्रेरणादायी ठरत आहे.

दरम्यान याची दखल घेऊन नुकताच कोकण परिषद तर्फे त्यांचा दादर येथे शिक्षण मंत्री आशिष शेलार रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला

झेंडूच्या रोपांची 50 ते 60 दिवसांनी वाढ होऊन फुले येतात व फुले तीन महिने चालतात त्यामुळे कमी कालावधी जास्त उत्पन्न मिळत असून झेंडूला औषध व खत, पाणीही कमी लागते तसेच त्यांच्या उग्रवासामुळे गुर ढोर खात नाहीत. तसेच वर्ष भर मागणी असते.त्यामुळे झेंडूची फुल शेती फायदेशीर ठरते - कल्पेश पाटील, शेतकरी, आंबेदा