शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी न करता कल्पेश पाटील या तरूणाने घेतली यशस्वी झेप; वर्षभरात झाला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 23:33 IST

६0 एकर जागेत लागवड, अ‍ॅडव्हांटेज कोकण परिषदेकडून सत्कार

शशिकांत ठाकूर

कासा : कासा जवळील कल्पेश पाटील या तरुणाने आधुनिक शेतीतून झेंडूच्या फुलांची लागवड करून मोठा विकास केला आहे. या व्यवसायात त्याला वर्षाकाठी १८ ते २० लाखाचे उत्पन्न मिळते.

आंबेदा गावातील कल्पेश दतू पाटील या कुणबी समाजातील तरुणाने नोकरी व्यवसाय कडे न वळता पारंपारिक पध्दतीची शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली. त्याने फुलांची मागणी लक्षात घेऊन फुल शेती केली. सुरुवातीला त्याने आपल्या वडिलोपार्जित 3 एकर जमिनीत झेंडूची लागवड केली. या व्यवसायात त्यांना चांगले उत्पन्न मिळाले हे लक्षात घेऊन त्याने फुलशेती व्यवसाय वाढविण्याचा निश्चय केला. व त्यांनी कासा, वाघाडी,बर्हाणपूर, आंबेदा, धामटने, चिंचपाडा, धरमपूर, भवाडी आशा आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी भाडे तत्वावर घेऊन ६0 एकर जमिनीवर झेंडूची लागवड केली आहे. या मध्ये कलकत्ता आॅरेंज, येल्लो, गोल्ड स्पॉट टू, आरोगोल्ड, अप्सरा, येल्लो अश्वगंधा या जातीच्या रोपांची लागवड करतात.

मागणी लक्षात घेऊन झेंडूच्या रोपांची लागवड आॅगस्ट ते जानेवारी महिन्यात चार ते पाच टप्प्यात आपल्याकडे भाड्याने घेतलेल्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये कल्पेश करत असून मे महिन्यापर्यंत हा सिझन चालतो. ही झेंडूची फुले दादर, कल्याण, पनवेल या सारख्या मोठ्या बाजारपेठे बरोबरच वापी, सुरत, बडोदा अशी मागणी असेल त्या बाजार पेठेत पाठवली जातात

गेल्या १० वर्षापासून कल्पेश हे फुल शेती करत असून. या व्यवसाय मध्ये त्याचे वडील व दोन भाऊ पुंडलिक आणि विजय त्यांना मदत करतात व मागील वर्षी कल्पेश यांनी 60 एकर जमिनीवर झेंडूची फुल शेती केली असून या मध्ये त्यांना 350 टन फुलांचे उत्पादन मिळाले व साधारण 30 ते 50 रु किलो भावाने विक्रीतून 60 लाखांची उलाढाल झाली असून 18 ते 20 लाखांचे उत्पन्न मिळाले. ही त्याची फुल शेती येथील तरु णांना प्रेरणादायी ठरत आहे.

दरम्यान याची दखल घेऊन नुकताच कोकण परिषद तर्फे त्यांचा दादर येथे शिक्षण मंत्री आशिष शेलार रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला

झेंडूच्या रोपांची 50 ते 60 दिवसांनी वाढ होऊन फुले येतात व फुले तीन महिने चालतात त्यामुळे कमी कालावधी जास्त उत्पन्न मिळत असून झेंडूला औषध व खत, पाणीही कमी लागते तसेच त्यांच्या उग्रवासामुळे गुर ढोर खात नाहीत. तसेच वर्ष भर मागणी असते.त्यामुळे झेंडूची फुल शेती फायदेशीर ठरते - कल्पेश पाटील, शेतकरी, आंबेदा