शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कल्याण-डोंबिवली पालिकेला उपसचिवपदाचे वावडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:41 IST

प्रभारी सचिवपद कायमस्वरूपी भरा, अशी मागणी जोर धरत असताना दुसरीकडे उपसचिवपद नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. परंतु, त्याकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

कल्याण : प्रभारी सचिवपद कायमस्वरूपी भरा, अशी मागणी जोर धरत असताना दुसरीकडे उपसचिवपद नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. परंतु, त्याकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये उपसचिवपदासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती विभागातील लिपिक किशोर शेळके यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने ते या पदासाठी पात्र ठरले. परंतु, सात महिने उलटूनही शेळके यांची नियुक्ती करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.२००७ पासून पालिकेतील सचिव आणि उपसचिवपदे रिक्त आहेत. प्रशासन व पदाधिकारी यांनी सोयीनुसार सचिवपद प्रभारी ठेवले असताना हे उपसचिवपदही रिक्तच राहणार का, अशी शंका उपस्थित होत होती. २०११ मध्ये उपसचिवपदासाठी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. परंतु, पुढे त्यांचे काय झाले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रशासनाने उपसचिवपद भरण्याबाबत कार्यवाही सुरू केली.सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी १८ डिसेंबरला लेखी परीक्षा घेतली. या पदासाठी १७ उमेदवारांचे अर्ज आले होते. मात्र, १४ उमेदवारांनी परीक्षा दिली. यात २०० गुणांच्या लेखी परीक्षेत शेळके यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. शेळके यांची पालिकेत २१ वर्षे सेवा झाली आहे. दरम्यान, परीक्षा उत्तीर्ण होऊनही अद्याप त्यांना साधे नियुक्तीपत्रकही दिलेले नाही. सचिवपदी संजय जाधव यांची प्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे. उद्यान अधीक्षकपदाचा पदभारही त्यांच्याकडे आहे. सचिवपदी कायमस्वरूपी नेमणूक करण्यात टाळाटाळ केली जात असताना आता उपसचिवपदाच्या नियुक्तीचाही घोळ प्रशासनाकडून घातला जात आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागात माहिती घेतली असता शेळके हे परीक्षा उत्तीर्ण झाले असले तरी त्यांच्या नियुक्तीपत्रावर आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नसल्याचेसांगण्यात आले. लवकरच याबाबतची कार्यवाही केली जाईल आणि संबंधित प्रस्ताव महासभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.महासभेचा निर्णय महत्त्वाचाआयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर उपसचिवपद नियुक्तीचा प्रस्ताव महासभेत ठेवला जाणार आहे. त्यामुळे महासभेचा निर्णय महत्त्वाचा आहे.सचिवपद नियुक्तीचा यापूर्वी घातलेला घोळ पाहता महासभेची भूमिका विशेष ठरणार आहे. महापालिकेचे पहिले सचिव चंद्रकांत माने यांच्या निवृत्तीनंतर सचिवपदासाठी घेतलेल्या परीक्षेत सर्वाधिक गुण पालिकेचे अधिकारी अनिल लाड यांना मिळाले होते. परंतु, तत्कालीन महासभेने दुसरा क्रमांक पटकावलेल्या उमेदवाराला पसंती दिली होती. या वादग्रस्त निर्णयामुळे अद्याप सचिवपद कायमस्वरूपी भरलेले नाही.मागचा हा अनुभव पाहता उपसचिवपदासाठी पात्र ठरलेल्या शेळके यांना हिरवा कंदील दाखवला जातो की, येथेही वाद घातला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.