शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:40 IST

जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही.

पालघर : जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही. याचा मोठा परिणाम जिल्ह्यावर होत असल्याचे खासदार राजेंद्र गावितांनी आपल्या भाषणातून मांडल्यानंतर पालकमंत्री विष्णु सवरा यांनी तुम्ही आता विरोधकाच्या भूमिकेत नसून सत्ताधाºयांचे खासदार असल्याचा आपल्याला विसर तर पडला नाही ना ?असा चिमटा काढला.जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन १ आॅगस्ट रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्र मा प्रसंगी बोलताना खासदार गावितांनी जिल्ह्यातील चांगले काम करणाºया अधिकाºयांचा सत्कार झाल्याचे समाधान व्यक्त करीत समस्यांचा पाढाच वाचला. जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय आदी २८ कार्यालये जिल्हा निर्मितीनंतर सुरूच झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री सवरा यांनी खासदार अजूनही विरोधी पक्षामध्ये असल्याप्रमाणे वागत आहेत, असा चिमटा काढला. तसेच मतदार संघातील समस्या दिल्लीत मांडा असा सल्लाही त्यांना लगोलग दिला.महसूल विभागाचा आढावा घेताना खासदारांनी विक्र मगड तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना त्याच्या कार्यालयातील १० जागा रिक्त असल्याचे सांगितले. मोखाडा तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसून २० जागा रिक्त, पुरवठा अधिकारी नाही, डहाणू तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना १० जागा रिक्त, वसई तालुक्यात नायब तहसीलदार, अव्वल कारकून आदी ४६ जागा रिक्त असल्याची शेकडो रिक्त जागांची जंत्रीच वाचून दाखवली. १२ बालविकास प्रकल्प अधिकाºयांच्या तुलनेत ९ प्रकल्पधिकाºया कडे स्वत:ची वाहने नसून ३ अधीकाºयांकडे असणारी वाहने नादुरु स्त झाली आहेत. हे सर्व अधिकारी कुपोषण निर्मूलन, स्थलांतर, स्वयंरोजगार, धान्य वाटप आदी काम करीत असताना कुपोषण निर्मूलन होणार कसे? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कुशल, अकुशल कामगारांच्या कामापोटी ग्राम सेवकाच्या मागणी वरून ९ कोटी १० लाखाच्या निधीची मागणी आजही पूर्ण करण्यात येत नसल्याची खंत खासदारांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थलांतर रोखणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे जनतेच्या प्रती आपली बांधिलकी जपत वेळीच आपल्या सरकार विरोधात ही आघाडी उघडायचे. अगदीच तोच कित्ता गावितानी वर्धापन दिनाच्या कार्यक्र म भाषणात गिरवित जिल्ह्यातील अनेक प्रश्न, समस्या सर्वांसमोर मांडीत जिल्ह्याचा विकासासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले.गावितांच्या फटकेबाजीन पालकमंत्री व्यथितखासदार गावितांच्या फटकेबाजीने व्यथित झालेल्या पालकमंत्री सवरा यांनी खासदारानी जिल्ह्यातीलरिक्त पदे, निधी, वाहनांची कमतरता, आदी प्रश्न उपस्थित करताना ते विरोधी पक्षात असल्या प्रमाणे वागत असल्याचे सांगून ते सत्ताधाºयांचे खासदार म्हणून निवडून आल्याचे भान ठेवण्याचा सल्ला दिला.गवितांनी जिल्हा निर्माण केला आणि चालवायला माझ्याकडे दिला त्यामुळे तो मला चालवता आला पाहिजे. मला जिल्हा चालवता येईल की नाही अशी शंका गाविताना आली आणि ते आता माझ्या बरोबरच आहेत. त्यामुळे आपण एकत्र राहिलो तर चांगल्या प्रकारे जिल्हा चालवू असेही शेवटी पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार