शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:40 IST

जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही.

पालघर : जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही. याचा मोठा परिणाम जिल्ह्यावर होत असल्याचे खासदार राजेंद्र गावितांनी आपल्या भाषणातून मांडल्यानंतर पालकमंत्री विष्णु सवरा यांनी तुम्ही आता विरोधकाच्या भूमिकेत नसून सत्ताधाºयांचे खासदार असल्याचा आपल्याला विसर तर पडला नाही ना ?असा चिमटा काढला.जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन १ आॅगस्ट रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्र मा प्रसंगी बोलताना खासदार गावितांनी जिल्ह्यातील चांगले काम करणाºया अधिकाºयांचा सत्कार झाल्याचे समाधान व्यक्त करीत समस्यांचा पाढाच वाचला. जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय आदी २८ कार्यालये जिल्हा निर्मितीनंतर सुरूच झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री सवरा यांनी खासदार अजूनही विरोधी पक्षामध्ये असल्याप्रमाणे वागत आहेत, असा चिमटा काढला. तसेच मतदार संघातील समस्या दिल्लीत मांडा असा सल्लाही त्यांना लगोलग दिला.महसूल विभागाचा आढावा घेताना खासदारांनी विक्र मगड तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना त्याच्या कार्यालयातील १० जागा रिक्त असल्याचे सांगितले. मोखाडा तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसून २० जागा रिक्त, पुरवठा अधिकारी नाही, डहाणू तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना १० जागा रिक्त, वसई तालुक्यात नायब तहसीलदार, अव्वल कारकून आदी ४६ जागा रिक्त असल्याची शेकडो रिक्त जागांची जंत्रीच वाचून दाखवली. १२ बालविकास प्रकल्प अधिकाºयांच्या तुलनेत ९ प्रकल्पधिकाºया कडे स्वत:ची वाहने नसून ३ अधीकाºयांकडे असणारी वाहने नादुरु स्त झाली आहेत. हे सर्व अधिकारी कुपोषण निर्मूलन, स्थलांतर, स्वयंरोजगार, धान्य वाटप आदी काम करीत असताना कुपोषण निर्मूलन होणार कसे? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कुशल, अकुशल कामगारांच्या कामापोटी ग्राम सेवकाच्या मागणी वरून ९ कोटी १० लाखाच्या निधीची मागणी आजही पूर्ण करण्यात येत नसल्याची खंत खासदारांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थलांतर रोखणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे जनतेच्या प्रती आपली बांधिलकी जपत वेळीच आपल्या सरकार विरोधात ही आघाडी उघडायचे. अगदीच तोच कित्ता गावितानी वर्धापन दिनाच्या कार्यक्र म भाषणात गिरवित जिल्ह्यातील अनेक प्रश्न, समस्या सर्वांसमोर मांडीत जिल्ह्याचा विकासासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले.गावितांच्या फटकेबाजीन पालकमंत्री व्यथितखासदार गावितांच्या फटकेबाजीने व्यथित झालेल्या पालकमंत्री सवरा यांनी खासदारानी जिल्ह्यातीलरिक्त पदे, निधी, वाहनांची कमतरता, आदी प्रश्न उपस्थित करताना ते विरोधी पक्षात असल्या प्रमाणे वागत असल्याचे सांगून ते सत्ताधाºयांचे खासदार म्हणून निवडून आल्याचे भान ठेवण्याचा सल्ला दिला.गवितांनी जिल्हा निर्माण केला आणि चालवायला माझ्याकडे दिला त्यामुळे तो मला चालवता आला पाहिजे. मला जिल्हा चालवता येईल की नाही अशी शंका गाविताना आली आणि ते आता माझ्या बरोबरच आहेत. त्यामुळे आपण एकत्र राहिलो तर चांगल्या प्रकारे जिल्हा चालवू असेही शेवटी पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार