शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:40 IST

जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही.

पालघर : जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही. याचा मोठा परिणाम जिल्ह्यावर होत असल्याचे खासदार राजेंद्र गावितांनी आपल्या भाषणातून मांडल्यानंतर पालकमंत्री विष्णु सवरा यांनी तुम्ही आता विरोधकाच्या भूमिकेत नसून सत्ताधाºयांचे खासदार असल्याचा आपल्याला विसर तर पडला नाही ना ?असा चिमटा काढला.जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन १ आॅगस्ट रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्र मा प्रसंगी बोलताना खासदार गावितांनी जिल्ह्यातील चांगले काम करणाºया अधिकाºयांचा सत्कार झाल्याचे समाधान व्यक्त करीत समस्यांचा पाढाच वाचला. जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय आदी २८ कार्यालये जिल्हा निर्मितीनंतर सुरूच झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री सवरा यांनी खासदार अजूनही विरोधी पक्षामध्ये असल्याप्रमाणे वागत आहेत, असा चिमटा काढला. तसेच मतदार संघातील समस्या दिल्लीत मांडा असा सल्लाही त्यांना लगोलग दिला.महसूल विभागाचा आढावा घेताना खासदारांनी विक्र मगड तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना त्याच्या कार्यालयातील १० जागा रिक्त असल्याचे सांगितले. मोखाडा तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसून २० जागा रिक्त, पुरवठा अधिकारी नाही, डहाणू तहसीलदारांना स्वत:चे वाहन नसताना १० जागा रिक्त, वसई तालुक्यात नायब तहसीलदार, अव्वल कारकून आदी ४६ जागा रिक्त असल्याची शेकडो रिक्त जागांची जंत्रीच वाचून दाखवली. १२ बालविकास प्रकल्प अधिकाºयांच्या तुलनेत ९ प्रकल्पधिकाºया कडे स्वत:ची वाहने नसून ३ अधीकाºयांकडे असणारी वाहने नादुरु स्त झाली आहेत. हे सर्व अधिकारी कुपोषण निर्मूलन, स्थलांतर, स्वयंरोजगार, धान्य वाटप आदी काम करीत असताना कुपोषण निर्मूलन होणार कसे? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कुशल, अकुशल कामगारांच्या कामापोटी ग्राम सेवकाच्या मागणी वरून ९ कोटी १० लाखाच्या निधीची मागणी आजही पूर्ण करण्यात येत नसल्याची खंत खासदारांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थलांतर रोखणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे जनतेच्या प्रती आपली बांधिलकी जपत वेळीच आपल्या सरकार विरोधात ही आघाडी उघडायचे. अगदीच तोच कित्ता गावितानी वर्धापन दिनाच्या कार्यक्र म भाषणात गिरवित जिल्ह्यातील अनेक प्रश्न, समस्या सर्वांसमोर मांडीत जिल्ह्याचा विकासासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले.गावितांच्या फटकेबाजीन पालकमंत्री व्यथितखासदार गावितांच्या फटकेबाजीने व्यथित झालेल्या पालकमंत्री सवरा यांनी खासदारानी जिल्ह्यातीलरिक्त पदे, निधी, वाहनांची कमतरता, आदी प्रश्न उपस्थित करताना ते विरोधी पक्षात असल्या प्रमाणे वागत असल्याचे सांगून ते सत्ताधाºयांचे खासदार म्हणून निवडून आल्याचे भान ठेवण्याचा सल्ला दिला.गवितांनी जिल्हा निर्माण केला आणि चालवायला माझ्याकडे दिला त्यामुळे तो मला चालवता आला पाहिजे. मला जिल्हा चालवता येईल की नाही अशी शंका गाविताना आली आणि ते आता माझ्या बरोबरच आहेत. त्यामुळे आपण एकत्र राहिलो तर चांगल्या प्रकारे जिल्हा चालवू असेही शेवटी पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार