शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कळंब, भुईगाव समुद्रकिनारे ग्रामस्थांकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:26 IST

कोरोना प्रादुर्भाव वाढला

विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसईतील कळंब, भुईगाव समुद्रकिनाऱ्यांवर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पर्यटकांना बंदी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामस्थांनी ही दक्षता घेतली आहे.

पर्यटकांनी किनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने कळंबपाठोपाठ भुईगावचा किनाराही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. कळंबच्या किनाऱ्यावर बंदी घातल्यानंतर पर्यटकांनी भुईगाव किनाऱ्याकडे धाव घेतल्याने आता हाही किनारा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबई आणि तालुक्यातील हजारो पर्यटक सुटीच्या दिवशी येत असतात. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ही गर्दी पुन्हा ओसंडू लागली होती. छटपूजेच्या निमित्तानेही या किनाऱ्यावर हजारो भाविकांची गर्दी होणार होती. मात्र, शासनानेच बंदी घातल्यामुळे दोन दिवस सर्व किनारे बंद ठेवण्यात आले होते. हीच संधी साधून कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास स्थानिक ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. कळंब किनाऱ्यावर बंदी घातल्यामुळे पर्यटकांनी भुईगावच्या किनाऱ्याकडे आपला मोर्चा वळवला होता. शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.

दरम्यान, विरार-ग्लोबल सिटीला लागून असलेले म्हारंबळपाडा हे गाव निसर्गसंपन्न आहे. शहराला लागून असले तरी अद्याप गावपण टिकून असल्याने अनेक लोक या ठिकाणी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी येत असतात. शिवाय, या गावाला लागूनच खाडी असल्याने अनेक जण या ठिकाणी निवांतपणा व्यतीत करतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून स्वच्छताकर म्हणून १० रुपये कर आकारला जातो. शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर शहरातील बगिचे, मैदाने, किनारे या ठिकाणी हळूहळू सूट देण्यात आली होती. त्यामुुुळे म्हारंबळ इथेही पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. मात्र, विरार ग्लोबल सिटी आणि परिसरातील नागरिक म्हारंबळपाडा येथे जाण्यास पसंती देत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थ कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार