शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

कळंब, भुईगाव समुद्रकिनारे ग्रामस्थांकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:26 IST

कोरोना प्रादुर्भाव वाढला

विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसईतील कळंब, भुईगाव समुद्रकिनाऱ्यांवर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पर्यटकांना बंदी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ग्रामस्थांनी ही दक्षता घेतली आहे.

पर्यटकांनी किनाऱ्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने कळंबपाठोपाठ भुईगावचा किनाराही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. कळंबच्या किनाऱ्यावर बंदी घातल्यानंतर पर्यटकांनी भुईगाव किनाऱ्याकडे धाव घेतल्याने आता हाही किनारा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबई आणि तालुक्यातील हजारो पर्यटक सुटीच्या दिवशी येत असतात. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ही गर्दी पुन्हा ओसंडू लागली होती. छटपूजेच्या निमित्तानेही या किनाऱ्यावर हजारो भाविकांची गर्दी होणार होती. मात्र, शासनानेच बंदी घातल्यामुळे दोन दिवस सर्व किनारे बंद ठेवण्यात आले होते. हीच संधी साधून कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास स्थानिक ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. कळंब किनाऱ्यावर बंदी घातल्यामुळे पर्यटकांनी भुईगावच्या किनाऱ्याकडे आपला मोर्चा वळवला होता. शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.

दरम्यान, विरार-ग्लोबल सिटीला लागून असलेले म्हारंबळपाडा हे गाव निसर्गसंपन्न आहे. शहराला लागून असले तरी अद्याप गावपण टिकून असल्याने अनेक लोक या ठिकाणी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी येत असतात. शिवाय, या गावाला लागूनच खाडी असल्याने अनेक जण या ठिकाणी निवांतपणा व्यतीत करतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून स्वच्छताकर म्हणून १० रुपये कर आकारला जातो. शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर शहरातील बगिचे, मैदाने, किनारे या ठिकाणी हळूहळू सूट देण्यात आली होती. त्यामुुुळे म्हारंबळ इथेही पर्यटकांचा ओघ वाढू लागला होता. मात्र, विरार ग्लोबल सिटी आणि परिसरातील नागरिक म्हारंबळपाडा येथे जाण्यास पसंती देत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थ कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार