शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पालघर कलेक्टर कचेरीवर पत्रकारांचा मोर्चा

By admin | Updated: October 4, 2016 02:10 IST

राज्यातील पत्रकारावर होत असलेले हल्ले, दाखल होत असलेले खोटे गुन्हे, मुस्कटदाबी, जेष्ठ पत्रकारांचे पेन्शन ई. बाबत निर्णय घेण्यास शासन वीस वर्षांपासून

पालघर : राज्यातील पत्रकारावर होत असलेले हल्ले, दाखल होत असलेले खोटे गुन्हे, मुस्कटदाबी, जेष्ठ पत्रकारांचे पेन्शन ई. बाबत निर्णय घेण्यास शासन वीस वर्षांपासून टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने सोमवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील पत्रकारांच्या सोळा संघटनांनी स्थापन केलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने हुतात्मा स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, उपाध्यक्ष सुरेश काटे,शाम आटे, नारायण पाटील, हुसेन खान, मच्छीन्द्र आगीवले, अमोल सांबरे, पालघर तालुका मराठी पत्रकार संघ हेमेंद्र पाटील, विजय घरत, विनायक पवार, के.नारायण,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजीव जोशी, नीरज राऊत,वैभव पालवे, प्रमोद पाटील, यांनी जिल्हाधिकारी बांगर आणि पोलीस अधिक्षिका राऊत यांना निवेदन सादर केले.आम्ही सत्तेत आल्यावर लगेच पत्रकार संरक्षण कायदा करू आणि जेष्ठ पत्रकारांना पेन्शन देऊ असे आश्वासन भाजपने नागपूर येथे पत्रकार हल्ला विरोधी समितीने काढलेल्या मोर्च्या दरम्यान दिले होते. सत्ता बदला नंतर भाजपा सरकार दोन वर्षापासून सत्तेत आल्यानंतर प्रतीक्षा करूनही पत्रकारांना न्याय मिळालेला नाही. सरकार कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना चिंता वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच आता पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा नवीन ट्रेंड महाराष्ट्रात सुरु झाला आहे. माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी मारक आणि समाजस्वास्थ्य बिघडविणारा आहे. म्हणून सरकारने कायद्याचा जो मसुदा तयार केला आहे त्यानुसार वटहुकूम काढावा आणि राज्यात तातडीने पत्रकारांना कायदेशीर संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.(वार्ताहर)