शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

जव्हार: राष्ट्रवादीचा भरपाईसाठी ठिय्या

By admin | Updated: May 28, 2016 02:18 IST

तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.

जव्हार : तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.दि.७ जून २०१५ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांची भरपाई आतापर्यंत मिळालेली नसून दिनांक १० मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन नुकसानभरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोकोत तालुका अध्यक्ष कमळाकर धूम, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, जिल्हा सरचिटणीस बळवंत गावित, यशवंत भोये, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सोऐब लुलानिया, दयानंद लहारे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात ७ जून, २०१५ रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे हाताशी आलेले आंब्याचे पीक वाया गेले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या वादळामध्ये शेकडो घरेही उद्ध्वस्त झाली होती. त्या वेळी नुकसानीचे पंचनामेही झाले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत नुकसानभरपाई पोहोचलीच नाही. तेव्हा दि.१४ सप्टेंबर २०१५ रोजी शासनाला जाग यावी, याकरिता पक्षाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र अजूनही १ वर्ष उलटून गेले असले तरी ही उर्वरित २२४७ शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी यांना उपोषणाचे लेखी पत्र दिले असता त्यांनी दि.२२ फेब्रुवारी २०१६ रोजी लेखी आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.यावर्षीही दि.१० मे २०१६ रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस पडला. यामध्ये आंबा, काजू, केळी, घरांचे व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.