शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जव्हार: राष्ट्रवादीचा भरपाईसाठी ठिय्या

By admin | Updated: May 28, 2016 02:18 IST

तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.

जव्हार : तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.दि.७ जून २०१५ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांची भरपाई आतापर्यंत मिळालेली नसून दिनांक १० मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन नुकसानभरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोकोत तालुका अध्यक्ष कमळाकर धूम, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, जिल्हा सरचिटणीस बळवंत गावित, यशवंत भोये, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सोऐब लुलानिया, दयानंद लहारे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात ७ जून, २०१५ रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे हाताशी आलेले आंब्याचे पीक वाया गेले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या वादळामध्ये शेकडो घरेही उद्ध्वस्त झाली होती. त्या वेळी नुकसानीचे पंचनामेही झाले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत नुकसानभरपाई पोहोचलीच नाही. तेव्हा दि.१४ सप्टेंबर २०१५ रोजी शासनाला जाग यावी, याकरिता पक्षाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र अजूनही १ वर्ष उलटून गेले असले तरी ही उर्वरित २२४७ शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी यांना उपोषणाचे लेखी पत्र दिले असता त्यांनी दि.२२ फेब्रुवारी २०१६ रोजी लेखी आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.यावर्षीही दि.१० मे २०१६ रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस पडला. यामध्ये आंबा, काजू, केळी, घरांचे व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.