शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

जव्हार: राष्ट्रवादीचा भरपाईसाठी ठिय्या

By admin | Updated: May 28, 2016 02:18 IST

तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.

जव्हार : तालुक्यातील राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिवनेरी गार्डन धाब्यासमोर गुरुवारी सकाळी ८.०० वा. पासून रास्ता रोका करण्यात आला.दि.७ जून २०१५ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांची भरपाई आतापर्यंत मिळालेली नसून दिनांक १० मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन नुकसानभरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्ता रोकोत तालुका अध्यक्ष कमळाकर धूम, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, जिल्हा सरचिटणीस बळवंत गावित, यशवंत भोये, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सोऐब लुलानिया, दयानंद लहारे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात ७ जून, २०१५ रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे हाताशी आलेले आंब्याचे पीक वाया गेले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या वादळामध्ये शेकडो घरेही उद्ध्वस्त झाली होती. त्या वेळी नुकसानीचे पंचनामेही झाले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत नुकसानभरपाई पोहोचलीच नाही. तेव्हा दि.१४ सप्टेंबर २०१५ रोजी शासनाला जाग यावी, याकरिता पक्षाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र अजूनही १ वर्ष उलटून गेले असले तरी ही उर्वरित २२४७ शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी यांना उपोषणाचे लेखी पत्र दिले असता त्यांनी दि.२२ फेब्रुवारी २०१६ रोजी लेखी आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.यावर्षीही दि.१० मे २०१६ रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस पडला. यामध्ये आंबा, काजू, केळी, घरांचे व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.