शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
3
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
5
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
6
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
7
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
8
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
9
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
10
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर
11
काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल
12
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
13
Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
14
निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
15
Mutual Fund असावा तर असा! कोणताही गाजावाजा नाही, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला जबरदस्त रिटर्न
16
नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
17
'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
18
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
19
'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
20
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?

जव्हारमध्ये नदी-नाले तुडुंब

By admin | Updated: July 2, 2017 05:33 IST

: शुक्रवारपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पाणीच पाणी असल्याचे दृष्य असून संपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : शुक्रवारपासून धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पाणीच पाणी असल्याचे दृष्य असून संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. दुसरीकडे धबधबे, नद्या व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शहरात शुक्रवारी ६७ मि. मी. पावसांची नोंद करण्यात आली असून ३० जून पर्यत ७३७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली असल्याची माहीती अपतकालीन विभागाच्या माया येवले यांनी लोकमतला दिली.जव्हार हे समुद्र सपाटी पासुन १८०० ते २००० फूट उंचीवर असल्यामुळे येथे कितीही पाऊस पडला तरी त्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे या भागात कुठेच पाणी भरलेले दिसून येत नाही, मात्र खेडोपाड्यावर डोगर दऱ्यांच्या मधील सखल मार्गावरील कमी उंचीच्या मोऱ्यांवरून पावसाचे अथवा पूराचे पाणी वाहू लागल्याने खेडोपाड्यातील बांधवांचा संपर्क तुटतो. त्यांना ते पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागते. यामुळे खेडोपाड्यातील रूग्णांचे मोठे हाल होत आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या सुविधांमुळे रूग्णांना जव्हारच्या कुटीर रूग्णालयात यावे लागते, आणि उपचार करावे लागते तसेच गरोदर स्त्रियांचे उपचार हे जव्हार कुटीर रूग्णालयात होत असल्यामुळे त्यांनाही जव्हारला येऊन उपचार घ्यावा लागतो, अशी परिस्थिती आहे. जूनचा पूर्वाध पूर्ण कोरडा गेल्यामुळे पावसासाठी प्रार्थना करव्या लागल्या. पाऊस पडू दे ! मात्र जून अखेरीस पाऊस इतका सुरू झाला की, शेतकऱ्यांच्या पेरण्याही वाहून गेल्या आहेत, त्यामुळे आता थांब रे बाबा म्हणावे लागते आहे.जव्हार, विक्रमगडचा संपर्क काही काळ खंडीतजव्हार-विक्रमगड मुख्य रस्त्यावर असलेल्या आणि सतत वादात असल्याने अपूर्ण राहिलेल्या साखरे गावातील पाचमाड पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जव्हार ते विक्रमगड जाण्याचा मार्ग अनेक तास बंद होता, पाणी कमी झाले की मोठी वाहने धोका पत्करून पूल पार करीत आहेत. परंतु छोट्या वाहनांना मात्र तासंतास ताटकळत पाणी कमी होण्याची वाट पहावी लागत आहे.