शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

जव्हारमध्ये पावसाची संततधार

By admin | Updated: July 11, 2016 01:45 IST

तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून पाऊसाच्या संततधारा सुरु आहेत. या पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे

जव्हार : तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून पाऊसाच्या संततधारा सुरु आहेत. या पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महत्वाच्या रस्त्यावंर पाणी आल्याने या भागातील संपर्कचे महत्वाचे माध्यम असणाऱ्या एसटीच्या सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. नदी, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहू लागले आहेत.संपूर्ण जव्हार तालुक्याला पावसाने झोडपले असून, आतापर्यंत २९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाऊसाच्या धारा सुरूच असल्याने दादरकोपरा, झाप, दाभलोन, दापटी असा मार्गावर काही काळ एसटीची बससेवा बंद ठेवावी लागली आहे. खाजगी वाहतुक जीप, ट्रक्स, वाहतूक देखील बंद असल्याने प्रवासी व पर्यटकांना अडकून पडावे लागले. तालुक्यातील ग्रामिण भागाकडे जाणारे मार्ग बंद झाले होते. खाजगी वाहने उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्रत्येक गावाला जाणाऱ्या एसटी बस तीन तास उशीराणे सोडण्यात येत असल्योन स्थानकात मोठी गर्दी होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांची गर्दी नव्हती. कालपासून तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या असल्यातरी कोणतीही जिवीत व वित्त हानी झाली नाही. तरी शेतकऱ्यांना शेतात जातांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)तलवाडा/विक्रमगड : गेल्या २४ तासात विक्रमगडला पावसाने चांगले झोडपुन काढले असुन शनिवारी रात्री पासुन ते रविवार पुर्ण दिवस पावसाने चांगले झोडपून काढले आहे़ संततधार सुरु असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजिवन विस्कळीत झाले होते. रविवार सुटीचा दिवस असांनाही विक्रमगडच्या मुख्य बाजार मंदावलेला होता. पावसाच्या तडाख्यामध्ये काही काळ वीज ही गायब झाली होती. तर विजेचा लंपडाव हा चालुच होता. मात्र , आज सुटटीचा दिवस असल्याने व हवेमध्ये गारवा असल्यान ेनोकरदार वर्गाने दिवसभर सक्तीचा आराम केला़दरम्यान, आवणीसाठी (भातलागवडीकरीता ) आवश्यक असा पाऊस गेल्या दोन दिवसापासुन सुरु झाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला दिसत होता़ नुकतीच कोळी भाजीचा नेवेद्य आपल्या शेतावरील देवदेवतांना देवुन पुढील कामाच्या शुभारं भाकरीता शेतकरी सरसावले असुन येत्या दोन दिवसांत विक्रमगड व परिसरात भातलागवडीच्या कामांना शुभारंभ होईल असे येथील शेतकरी सुनिल सांबरे यांनी लोकमत शीबोलतांना सांगीतले़ जोरदार पावसाच्या आगमनाने मात्र सर्वत्र पाणीच पाणीच झाले असुन पाण्यातुन वाट शोधत जावे लागत होते़ पावसाने सर्वत्र चांगली सुरुवात केली असुन शेती योग्य असा दमदार पाउस पडला आहे़ त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या शेतकरी वर्गाने आता कामांना वेगाने सुरुवात केली आहे.