शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये पावसाची संततधार

By admin | Updated: July 11, 2016 01:45 IST

तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून पाऊसाच्या संततधारा सुरु आहेत. या पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे

जव्हार : तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून पाऊसाच्या संततधारा सुरु आहेत. या पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महत्वाच्या रस्त्यावंर पाणी आल्याने या भागातील संपर्कचे महत्वाचे माध्यम असणाऱ्या एसटीच्या सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. नदी, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहू लागले आहेत.संपूर्ण जव्हार तालुक्याला पावसाने झोडपले असून, आतापर्यंत २९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाऊसाच्या धारा सुरूच असल्याने दादरकोपरा, झाप, दाभलोन, दापटी असा मार्गावर काही काळ एसटीची बससेवा बंद ठेवावी लागली आहे. खाजगी वाहतुक जीप, ट्रक्स, वाहतूक देखील बंद असल्याने प्रवासी व पर्यटकांना अडकून पडावे लागले. तालुक्यातील ग्रामिण भागाकडे जाणारे मार्ग बंद झाले होते. खाजगी वाहने उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्रत्येक गावाला जाणाऱ्या एसटी बस तीन तास उशीराणे सोडण्यात येत असल्योन स्थानकात मोठी गर्दी होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांची गर्दी नव्हती. कालपासून तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या असल्यातरी कोणतीही जिवीत व वित्त हानी झाली नाही. तरी शेतकऱ्यांना शेतात जातांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)तलवाडा/विक्रमगड : गेल्या २४ तासात विक्रमगडला पावसाने चांगले झोडपुन काढले असुन शनिवारी रात्री पासुन ते रविवार पुर्ण दिवस पावसाने चांगले झोडपून काढले आहे़ संततधार सुरु असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजिवन विस्कळीत झाले होते. रविवार सुटीचा दिवस असांनाही विक्रमगडच्या मुख्य बाजार मंदावलेला होता. पावसाच्या तडाख्यामध्ये काही काळ वीज ही गायब झाली होती. तर विजेचा लंपडाव हा चालुच होता. मात्र , आज सुटटीचा दिवस असल्याने व हवेमध्ये गारवा असल्यान ेनोकरदार वर्गाने दिवसभर सक्तीचा आराम केला़दरम्यान, आवणीसाठी (भातलागवडीकरीता ) आवश्यक असा पाऊस गेल्या दोन दिवसापासुन सुरु झाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला दिसत होता़ नुकतीच कोळी भाजीचा नेवेद्य आपल्या शेतावरील देवदेवतांना देवुन पुढील कामाच्या शुभारं भाकरीता शेतकरी सरसावले असुन येत्या दोन दिवसांत विक्रमगड व परिसरात भातलागवडीच्या कामांना शुभारंभ होईल असे येथील शेतकरी सुनिल सांबरे यांनी लोकमत शीबोलतांना सांगीतले़ जोरदार पावसाच्या आगमनाने मात्र सर्वत्र पाणीच पाणीच झाले असुन पाण्यातुन वाट शोधत जावे लागत होते़ पावसाने सर्वत्र चांगली सुरुवात केली असुन शेती योग्य असा दमदार पाउस पडला आहे़ त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या शेतकरी वर्गाने आता कामांना वेगाने सुरुवात केली आहे.