शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये पावसाची संततधार

By admin | Updated: July 11, 2016 01:45 IST

तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून पाऊसाच्या संततधारा सुरु आहेत. या पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे

जव्हार : तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून पाऊसाच्या संततधारा सुरु आहेत. या पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महत्वाच्या रस्त्यावंर पाणी आल्याने या भागातील संपर्कचे महत्वाचे माध्यम असणाऱ्या एसटीच्या सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. नदी, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहू लागले आहेत.संपूर्ण जव्हार तालुक्याला पावसाने झोडपले असून, आतापर्यंत २९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाऊसाच्या धारा सुरूच असल्याने दादरकोपरा, झाप, दाभलोन, दापटी असा मार्गावर काही काळ एसटीची बससेवा बंद ठेवावी लागली आहे. खाजगी वाहतुक जीप, ट्रक्स, वाहतूक देखील बंद असल्याने प्रवासी व पर्यटकांना अडकून पडावे लागले. तालुक्यातील ग्रामिण भागाकडे जाणारे मार्ग बंद झाले होते. खाजगी वाहने उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्रत्येक गावाला जाणाऱ्या एसटी बस तीन तास उशीराणे सोडण्यात येत असल्योन स्थानकात मोठी गर्दी होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांची गर्दी नव्हती. कालपासून तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या असल्यातरी कोणतीही जिवीत व वित्त हानी झाली नाही. तरी शेतकऱ्यांना शेतात जातांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)तलवाडा/विक्रमगड : गेल्या २४ तासात विक्रमगडला पावसाने चांगले झोडपुन काढले असुन शनिवारी रात्री पासुन ते रविवार पुर्ण दिवस पावसाने चांगले झोडपून काढले आहे़ संततधार सुरु असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजिवन विस्कळीत झाले होते. रविवार सुटीचा दिवस असांनाही विक्रमगडच्या मुख्य बाजार मंदावलेला होता. पावसाच्या तडाख्यामध्ये काही काळ वीज ही गायब झाली होती. तर विजेचा लंपडाव हा चालुच होता. मात्र , आज सुटटीचा दिवस असल्याने व हवेमध्ये गारवा असल्यान ेनोकरदार वर्गाने दिवसभर सक्तीचा आराम केला़दरम्यान, आवणीसाठी (भातलागवडीकरीता ) आवश्यक असा पाऊस गेल्या दोन दिवसापासुन सुरु झाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला दिसत होता़ नुकतीच कोळी भाजीचा नेवेद्य आपल्या शेतावरील देवदेवतांना देवुन पुढील कामाच्या शुभारं भाकरीता शेतकरी सरसावले असुन येत्या दोन दिवसांत विक्रमगड व परिसरात भातलागवडीच्या कामांना शुभारंभ होईल असे येथील शेतकरी सुनिल सांबरे यांनी लोकमत शीबोलतांना सांगीतले़ जोरदार पावसाच्या आगमनाने मात्र सर्वत्र पाणीच पाणीच झाले असुन पाण्यातुन वाट शोधत जावे लागत होते़ पावसाने सर्वत्र चांगली सुरुवात केली असुन शेती योग्य असा दमदार पाउस पडला आहे़ त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या शेतकरी वर्गाने आता कामांना वेगाने सुरुवात केली आहे.