शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जव्हारची ‘ती’ घटना भूकबळीची नाही; आदिवासी महिलेच्या आत्महत्येचे राजकारण नको- सुनील भुसारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:15 IST

भूकबळीचे कारण नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या आत्महत्येचे राजकारण करू नये. हा भूकबळीचा प्रकार नसल्याचे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यातील देहरे ग्रामपंचायत हद्दीतील कडव्याची माळ येथे मंगळवारी मंगला दिलीप वाघ हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वत:ही फाशी घेतल्याची घटना घडली होती. ही घटना भूकबळीतून घडल्याची चर्चा होती. मात्र आता यामागे भूकबळीचे कारण नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या आत्महत्येचे राजकारण करू नये. हा भूकबळीचा प्रकार नसल्याचे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.आमदार भुसारा यांनी घटनास्थळाची पाहणी करून या महिलेच्या पतीशीही बातचीत केली. त्यांच्यासोबत यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे, बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, उपसरपंच संदीप माळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मृत महिलेचे पती दिलीप यांनी सांगितले की, घरात अन्नधान्य पुरेसे आहे. गरिबी किंवा भूकबळी हे पत्नीच्या आत्महत्येमागचे कारण नाही. खायला नाही म्हणून कुणी आत्महत्या करेल अशी स्थिती गावात नाही. स्वस्त धान्य दुकानदारही पैसे नसेल तर उधार धान्य देत असल्याचे दिलीप यांनी सांगितले.महिलेच्या पतीची भेट घेतल्यानंतर आ. भुसारा म्हणाले की, या आदिवासी महिलेच्या आत्महत्येचे कुणीही राजकारण करू नये. आत्महत्येला भूकबळीचे स्वरूप देऊ नये. गरिबीला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा उल्लेख फिर्यादीत नसल्याचे उपसरपंच गवळी यांनीही सांगितले.>मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलीपीडित कुटुंबाला काही वस्तंूची यावेळी मदत करण्यात आली. याशिवाय, रोख रक्कमही मदत म्हणून देण्यात आली. मृत महिलेला सात वर्षांची मुलगी असून तिच्या शिक्षणाची जबाबदारी यावेळी भुसारा यांनी घेतली. सरकार पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी सांबरे यांनी दिली.