शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीआयपी धरणाला झाडांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:28 IST

सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.

अंबरनाथ : सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.कल्याण रेल्वे स्थानकात वाफेवर चालणाºया इंजिनांसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी ग्रेट इंडियन पॅनसूल (जीआयपी) या कंपनीने मलंगगडाच्या पायथ्याशी काकाळेजवळ १९१० मध्ये धरण बांधले.या धरणातून नियमित कल्याणला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, नंतरच्या काळात डिझेलवर इंजीन आल्यावर या धरणातील पाण्याचा वापर कमी झाला.१९९७ पर्यंत कल्याण रेल्वे स्थानकात यातून पाणीपुरवठा होत होता. मात्र, नंतर कल्याण रेल्वे स्थानकातही पाण्याचे दुसरे स्रोत निर्माण झाल्यावर या धरणातील पाणी तसेच पडून राहिले. जीआयपी टँक हे वालधुनी नदीपात्रात बांधण्यात आले आहे. कित्येक वर्षे या धरणाचा वापर होत नसल्याने येथील व्हॉल्व्ह यंत्रणाही बिघडली आहे. हे पाणी पडून राहिल्याने रेल्वेने या पाण्याचा वापर करून मिनरल वॉटरचा रेल नीर प्रकल्प उभारला. रेल नीर प्रकल्प चालवणाºया कंपनीला हे पाणी ४० पैसे प्रतिलीटर या दराने विकण्यात येते. या धरणातून रेल्वेला आर्थिक लाभ होत असतानाही रेल्वेने या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर मात्र कोणताही खर्च केलेला नाही. आज या धरणाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडे पूर्णत: तुटले आहेत. अनेक ठिकाणी धरणाला गळती लागली आहे. भिंतीवर वड आणि पिंपळाचे वृक्ष मोठे होत आहेत. या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. चार ते पाच वर्षांपासून या धरणावरील वृक्षांची छाटणीदेखील केलेली नाही. त्यामुळे हे धरण आता रेल्वेसाठी फायद्याचे ठरत असले, तरी नागरिकांसाठी धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे आता या वृक्षांबाबत काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.जीआयपी टँकच्या पाण्याचा वापर मिनरल वॉटरसाठी रेल्वे प्रशासन करत आहे. या पाण्यावर नफा देणारा प्रकल्प उभा असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती आणि धरणावर आलेले वड-पिंपळाचे वृक्ष छाटण्याची गरज आहे.- सदाशिव पाटील, माजी बांधकाम सभापती