शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जीआयपी धरणाला झाडांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:28 IST

सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.

अंबरनाथ : सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.कल्याण रेल्वे स्थानकात वाफेवर चालणाºया इंजिनांसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी ग्रेट इंडियन पॅनसूल (जीआयपी) या कंपनीने मलंगगडाच्या पायथ्याशी काकाळेजवळ १९१० मध्ये धरण बांधले.या धरणातून नियमित कल्याणला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, नंतरच्या काळात डिझेलवर इंजीन आल्यावर या धरणातील पाण्याचा वापर कमी झाला.१९९७ पर्यंत कल्याण रेल्वे स्थानकात यातून पाणीपुरवठा होत होता. मात्र, नंतर कल्याण रेल्वे स्थानकातही पाण्याचे दुसरे स्रोत निर्माण झाल्यावर या धरणातील पाणी तसेच पडून राहिले. जीआयपी टँक हे वालधुनी नदीपात्रात बांधण्यात आले आहे. कित्येक वर्षे या धरणाचा वापर होत नसल्याने येथील व्हॉल्व्ह यंत्रणाही बिघडली आहे. हे पाणी पडून राहिल्याने रेल्वेने या पाण्याचा वापर करून मिनरल वॉटरचा रेल नीर प्रकल्प उभारला. रेल नीर प्रकल्प चालवणाºया कंपनीला हे पाणी ४० पैसे प्रतिलीटर या दराने विकण्यात येते. या धरणातून रेल्वेला आर्थिक लाभ होत असतानाही रेल्वेने या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर मात्र कोणताही खर्च केलेला नाही. आज या धरणाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडे पूर्णत: तुटले आहेत. अनेक ठिकाणी धरणाला गळती लागली आहे. भिंतीवर वड आणि पिंपळाचे वृक्ष मोठे होत आहेत. या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. चार ते पाच वर्षांपासून या धरणावरील वृक्षांची छाटणीदेखील केलेली नाही. त्यामुळे हे धरण आता रेल्वेसाठी फायद्याचे ठरत असले, तरी नागरिकांसाठी धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे आता या वृक्षांबाबत काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.जीआयपी टँकच्या पाण्याचा वापर मिनरल वॉटरसाठी रेल्वे प्रशासन करत आहे. या पाण्यावर नफा देणारा प्रकल्प उभा असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती आणि धरणावर आलेले वड-पिंपळाचे वृक्ष छाटण्याची गरज आहे.- सदाशिव पाटील, माजी बांधकाम सभापती