शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जीआयपी धरणाला झाडांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:28 IST

सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.

अंबरनाथ : सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.कल्याण रेल्वे स्थानकात वाफेवर चालणाºया इंजिनांसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी ग्रेट इंडियन पॅनसूल (जीआयपी) या कंपनीने मलंगगडाच्या पायथ्याशी काकाळेजवळ १९१० मध्ये धरण बांधले.या धरणातून नियमित कल्याणला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, नंतरच्या काळात डिझेलवर इंजीन आल्यावर या धरणातील पाण्याचा वापर कमी झाला.१९९७ पर्यंत कल्याण रेल्वे स्थानकात यातून पाणीपुरवठा होत होता. मात्र, नंतर कल्याण रेल्वे स्थानकातही पाण्याचे दुसरे स्रोत निर्माण झाल्यावर या धरणातील पाणी तसेच पडून राहिले. जीआयपी टँक हे वालधुनी नदीपात्रात बांधण्यात आले आहे. कित्येक वर्षे या धरणाचा वापर होत नसल्याने येथील व्हॉल्व्ह यंत्रणाही बिघडली आहे. हे पाणी पडून राहिल्याने रेल्वेने या पाण्याचा वापर करून मिनरल वॉटरचा रेल नीर प्रकल्प उभारला. रेल नीर प्रकल्प चालवणाºया कंपनीला हे पाणी ४० पैसे प्रतिलीटर या दराने विकण्यात येते. या धरणातून रेल्वेला आर्थिक लाभ होत असतानाही रेल्वेने या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर मात्र कोणताही खर्च केलेला नाही. आज या धरणाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडे पूर्णत: तुटले आहेत. अनेक ठिकाणी धरणाला गळती लागली आहे. भिंतीवर वड आणि पिंपळाचे वृक्ष मोठे होत आहेत. या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. चार ते पाच वर्षांपासून या धरणावरील वृक्षांची छाटणीदेखील केलेली नाही. त्यामुळे हे धरण आता रेल्वेसाठी फायद्याचे ठरत असले, तरी नागरिकांसाठी धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे आता या वृक्षांबाबत काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.जीआयपी टँकच्या पाण्याचा वापर मिनरल वॉटरसाठी रेल्वे प्रशासन करत आहे. या पाण्यावर नफा देणारा प्रकल्प उभा असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती आणि धरणावर आलेले वड-पिंपळाचे वृक्ष छाटण्याची गरज आहे.- सदाशिव पाटील, माजी बांधकाम सभापती