शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जीआयपी धरणाला झाडांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:28 IST

सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.

अंबरनाथ : सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.कल्याण रेल्वे स्थानकात वाफेवर चालणाºया इंजिनांसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी ग्रेट इंडियन पॅनसूल (जीआयपी) या कंपनीने मलंगगडाच्या पायथ्याशी काकाळेजवळ १९१० मध्ये धरण बांधले.या धरणातून नियमित कल्याणला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, नंतरच्या काळात डिझेलवर इंजीन आल्यावर या धरणातील पाण्याचा वापर कमी झाला.१९९७ पर्यंत कल्याण रेल्वे स्थानकात यातून पाणीपुरवठा होत होता. मात्र, नंतर कल्याण रेल्वे स्थानकातही पाण्याचे दुसरे स्रोत निर्माण झाल्यावर या धरणातील पाणी तसेच पडून राहिले. जीआयपी टँक हे वालधुनी नदीपात्रात बांधण्यात आले आहे. कित्येक वर्षे या धरणाचा वापर होत नसल्याने येथील व्हॉल्व्ह यंत्रणाही बिघडली आहे. हे पाणी पडून राहिल्याने रेल्वेने या पाण्याचा वापर करून मिनरल वॉटरचा रेल नीर प्रकल्प उभारला. रेल नीर प्रकल्प चालवणाºया कंपनीला हे पाणी ४० पैसे प्रतिलीटर या दराने विकण्यात येते. या धरणातून रेल्वेला आर्थिक लाभ होत असतानाही रेल्वेने या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर मात्र कोणताही खर्च केलेला नाही. आज या धरणाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडे पूर्णत: तुटले आहेत. अनेक ठिकाणी धरणाला गळती लागली आहे. भिंतीवर वड आणि पिंपळाचे वृक्ष मोठे होत आहेत. या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. चार ते पाच वर्षांपासून या धरणावरील वृक्षांची छाटणीदेखील केलेली नाही. त्यामुळे हे धरण आता रेल्वेसाठी फायद्याचे ठरत असले, तरी नागरिकांसाठी धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे आता या वृक्षांबाबत काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.जीआयपी टँकच्या पाण्याचा वापर मिनरल वॉटरसाठी रेल्वे प्रशासन करत आहे. या पाण्यावर नफा देणारा प्रकल्प उभा असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती आणि धरणावर आलेले वड-पिंपळाचे वृक्ष छाटण्याची गरज आहे.- सदाशिव पाटील, माजी बांधकाम सभापती