शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

ते १७ वर्षे ‘उघड्यावर’

By admin | Updated: January 30, 2016 02:19 IST

हगणदारीमुक्त पालघरचा नारा देणाऱ्या पालघर नगरपरिषदेला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांत निवासस्थान तर सोडाच, प्रत्येकाच्या घरी शौचालयही उपलब्ध करून देता

पालघर/नंडोरे : हगणदारीमुक्त पालघरचा नारा देणाऱ्या पालघर नगरपरिषदेला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांत निवासस्थान तर सोडाच, प्रत्येकाच्या घरी शौचालयही उपलब्ध करून देता आले नाही. नगरपरिषद हद्दीत महाविद्यालय मार्गावर गोठणपूर भागात नगरपरिषदेची सफाई कर्मचारी वसाहत आहे. पालघर ग्रामपंचायतीच्या काळापासून हे सफाई कर्मचारी या सेवेत आहेत. ही वसाहत गेल्या ४०-५० वर्षांपासून असून १९९८ मध्ये नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर परिणामी हे कर्मचारी नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी बनले. या वसाहतीत एकूण १८ खोल्या असून सुमारे १०० कर्मचारी येथे आपल्या पोराबाळांसह दाटीवाटीने राहतात. ग्रामपंचायत असताना बांधलेल्या या वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. भिंती पोकळ झाल्या आहेत, पत्रे तुटलेले आहेत, अंघोळीला मोरी व्यवस्थित नाही, अशा अवस्थेत हे सफाई कर्मचारी या वसाहतीत राहत आहेत. या सफाई कर्मचारी वसाहतीकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचे चित्र येथे दिसत आहे.या कर्मचारी वसाहतीला गेल्या अनेक वर्षांपासून शौचालयही नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. या वसाहतीमधील एका खोलीत संपूर्ण वसाहतीचे लाइट मीटर्स बसविलेले असून मीटर बॉक्स तारेवर टांगून ठेवले असून त्या खोलीतही एक कुटुंब राहत आहे. साहजिकच काही दुघर्टना घडली तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मोहंमद हुसेन खान यांनी या प्रकरणी नगरपरिषदेकडे पत्रव्यवहारही केला होता. परंतु, त्यांच्या या कैफियतीकडे लक्ष द्यायला कुणाला फुरसतही मिळालेली नाही. या प्रभागातून न. परिषद स्थापन झाल्यापासून अनेक नगरसेवक निवडून आले. पण, परिस्थिती जैसे थे आहे. पालघर न. परिषद स्थापन झाल्यापासून न.प.ने शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यंदा मात्र नगरपरिषदेने हगणदारीमुक्तीचा नारा दिला आहे.पण, पालघर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे. या कर्मचारी वसाहतीची पडझड झाली असून पावसाळ्यात या खोल्यांमध्ये गुडघाभर पाणी शिरते. यामुळे घरातल्या सामानाची नासधूस तर होतेच, पण या पाणी भरलेल्या खोल्यांमध्ये राहणार कसे, हाही प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर भेडसावत आहे. येथे पिण्याच्या पाण्याचीही मारामारच आहे. एवढ्या खोल्यांना सार्वजनिक दोनच नळ दिलेले आहेत व नगरपरिषदेचे पाणी येते. ते फक्त दोन तास या व्यथा कर्मचाऱ्यांच्या असून या कर्मचाऱ्यांना वालीच नाही, असे चित्र स्पष्ट होत आहे. (वार्ताहर) वसाहतीसमोर मोठे अंगण होते. अंगणात अनेक वर्षांपासून मंदिर बांधलेले होते. नगरपरिषदेने या ठिकाणी भले मोठे गटार बांधून मंदिरही तोडले, पण आमच्यासाठीच असलेल्या बोअरिंगही या गटारापायी तोडून टाकल्या. अनेक वर्षांपासून आम्ही नवरात्रोत्सव साजरा करतो. जागेअभावी आता तो कसा साजरा करावा, हाही प्रश्न पडतो आहे. - मुकेश सोलंकीआम्ही व आमचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत आहोत, पण ही अवस्था पाहता मुलाबाळांना घेऊन कसे राहणार, हा प्रश्न पडतो आहे. - अजय रमण सोलंकी, कर्मचारीमाझ्या खोलीत असलेले मीटरचे बॉक्स तारेने तात्पुरते बांधले असून कधीही बॉक्स खाली पडून दुर्घटना घडू शकते. घरात म्हातारे माणूस राहत असून नेहमीच धास्ती असते. सर्व मीटरच्या वायरी खोलीवरून गेल्याने वजनाने पत्रेही पडू शकतात. - मधू रामजी बारिया, कर्मचारीघराची ही अवस्था बघता बारीकसारीक दुरुस्ती स्वखर्चाने करावी लागते. एवढ्या वर्षात बरेच जण पाहणी करून गेले, पण वसाहतीसाठी काहीच केले नाही. - कुशाल वाघेला