शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

नियमांना बगल देत आयटीआयची परीक्षा; विक्रमगडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:20 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे.

- अजय महाडिकठाणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे. २०१७ ते २०१९ या बॅचमधील काही परिक्षार्थींची हजेरी नियमानुसार पुर्ण नसतानाही त्यांना परीक्षेचा बसू दिले जात असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रादेशिक संचलनालय मुंबई येथे तक्रार करण्यात आली आहे.या संस्थेतील गट निर्देशक एस. आर. घुगे व प्रभारी प्राचार्य परदेशी यांनी संगनमताने प्रशिक्षणार्थ्यांना हजेरी व प्रशिक्षणाची सुट देत परीक्षेला बसविल्याचा आरोप संतोष जाधव यांनी केला आहे. आॅगस्ट २०१७ ते जुलै २०१८ या आय.टी.आय.च्या वेल्डर बॅचचे कुणाल जयराम मुरोडे व भुषण मुरलीधर भोई या दोघांचे हजेरीचे प्रमाण ५० ते ५५ टक्केपेक्षा कमी असल्याने त्यांना जुलै-२०१८ मध्ये झालेल्या सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेला बसता आले नव्हते. दरम्यान, घुगे व परदेशी यांनी वरील प्रशिक्षणार्थ्यांना जानेवारी २०१९ च्या परीक्षेला बसण्याची अनुमती देऊन नियमावली पायदळी तुडवली आहे.प्रशिक्षणार्थ्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशिक्षण अपुर्ण राहिल्यास योग्य त्या कारणासहीत तसा प्रस्ताव सहसंचालकांना सादर करुन त्याच्या परवानगीने प्रशिक्षणार्थ्यांची हजेरी व प्रशिक्षण पुर्ण झाल्याची खात्री करुनच त्यांना परीक्षेला पुन्हा बसवगी दिली जाते. मात्र, वरील दोन्ही प्रशिक्षणार्थी आय.टी.आय.मध्ये सदर काळात गैरहजर राहिल्याचे कागदोपत्री स्पष्ट असताना त्यांना जानेवारी-२०१९ च्या परीक्षेसाठी पात्र ठरविल्याने नियमित असणाºया अन्य विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले. यासंदर्भात प्रधानसचिव, कौशल्य विकास उद्योजकता विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.वरिष्ठ कार्यालयाचीही केली दिशाभूल?संधाता (वेल्डर) विभागातील या दोन्ही विद्यार्थ्यांबाबत जून २०१८ मध्ये डी. वाय. गवस या अध्यापकाने सततच्या गैरहजेरी बाबत चार रिपोर्ट दिले आहेत. त्यांची हजेरी ८० टक्के पेक्षा कमी असून त्यांना वारंवार सूचना देऊन ही गैरहजेरी कायम असल्याने त्यांना परीक्षेला बसू दिले जाऊ नये असे स्पष्ट केले आहे.या प्रकरणामध्ये गटनिर्देशक एस.आर. घुगे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांची आॅगस्ट २०१८ मध्ये प्रशिक्षण व हजेरी पुणे केल्याची माहिती दिली आहे. मात्र, ८०% हजेरी व प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी किमान तीन महिन्याचा अवधी लागतो. त्यातच शिल्प निर्देशक डी. वाय. गवस यांना २७ जुलै २०१९ ला बदलीचे आदेश आले असून ते ३१ जुलै नंतर कुर्ला नेहरुनगर येथील आयटीआयमध्ये रुजू झाल्याने घुगे यांचा दावा निराधार ठरतो.सदर विद्यार्थ्यांचे आॅगस्ट २०१८ मध्ये प्रशिक्षण व हजेरी पुर्ण के ली असून तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. त्या आधारेच ते परीक्षेला बसले असल्यामुळे आरोप निराधार आहेत.- एस.आर. घुगे, गटनिर्देशक आय.टी.आय. विक्रमगड

टॅग्स :Educationशिक्षण