शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नियमांना बगल देत आयटीआयची परीक्षा; विक्रमगडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:20 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे.

- अजय महाडिकठाणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे. २०१७ ते २०१९ या बॅचमधील काही परिक्षार्थींची हजेरी नियमानुसार पुर्ण नसतानाही त्यांना परीक्षेचा बसू दिले जात असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रादेशिक संचलनालय मुंबई येथे तक्रार करण्यात आली आहे.या संस्थेतील गट निर्देशक एस. आर. घुगे व प्रभारी प्राचार्य परदेशी यांनी संगनमताने प्रशिक्षणार्थ्यांना हजेरी व प्रशिक्षणाची सुट देत परीक्षेला बसविल्याचा आरोप संतोष जाधव यांनी केला आहे. आॅगस्ट २०१७ ते जुलै २०१८ या आय.टी.आय.च्या वेल्डर बॅचचे कुणाल जयराम मुरोडे व भुषण मुरलीधर भोई या दोघांचे हजेरीचे प्रमाण ५० ते ५५ टक्केपेक्षा कमी असल्याने त्यांना जुलै-२०१८ मध्ये झालेल्या सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेला बसता आले नव्हते. दरम्यान, घुगे व परदेशी यांनी वरील प्रशिक्षणार्थ्यांना जानेवारी २०१९ च्या परीक्षेला बसण्याची अनुमती देऊन नियमावली पायदळी तुडवली आहे.प्रशिक्षणार्थ्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशिक्षण अपुर्ण राहिल्यास योग्य त्या कारणासहीत तसा प्रस्ताव सहसंचालकांना सादर करुन त्याच्या परवानगीने प्रशिक्षणार्थ्यांची हजेरी व प्रशिक्षण पुर्ण झाल्याची खात्री करुनच त्यांना परीक्षेला पुन्हा बसवगी दिली जाते. मात्र, वरील दोन्ही प्रशिक्षणार्थी आय.टी.आय.मध्ये सदर काळात गैरहजर राहिल्याचे कागदोपत्री स्पष्ट असताना त्यांना जानेवारी-२०१९ च्या परीक्षेसाठी पात्र ठरविल्याने नियमित असणाºया अन्य विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले. यासंदर्भात प्रधानसचिव, कौशल्य विकास उद्योजकता विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.वरिष्ठ कार्यालयाचीही केली दिशाभूल?संधाता (वेल्डर) विभागातील या दोन्ही विद्यार्थ्यांबाबत जून २०१८ मध्ये डी. वाय. गवस या अध्यापकाने सततच्या गैरहजेरी बाबत चार रिपोर्ट दिले आहेत. त्यांची हजेरी ८० टक्के पेक्षा कमी असून त्यांना वारंवार सूचना देऊन ही गैरहजेरी कायम असल्याने त्यांना परीक्षेला बसू दिले जाऊ नये असे स्पष्ट केले आहे.या प्रकरणामध्ये गटनिर्देशक एस.आर. घुगे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांची आॅगस्ट २०१८ मध्ये प्रशिक्षण व हजेरी पुणे केल्याची माहिती दिली आहे. मात्र, ८०% हजेरी व प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी किमान तीन महिन्याचा अवधी लागतो. त्यातच शिल्प निर्देशक डी. वाय. गवस यांना २७ जुलै २०१९ ला बदलीचे आदेश आले असून ते ३१ जुलै नंतर कुर्ला नेहरुनगर येथील आयटीआयमध्ये रुजू झाल्याने घुगे यांचा दावा निराधार ठरतो.सदर विद्यार्थ्यांचे आॅगस्ट २०१८ मध्ये प्रशिक्षण व हजेरी पुर्ण के ली असून तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. त्या आधारेच ते परीक्षेला बसले असल्यामुळे आरोप निराधार आहेत.- एस.आर. घुगे, गटनिर्देशक आय.टी.आय. विक्रमगड

टॅग्स :Educationशिक्षण