शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पालिकेतून ३५ गावे वगळण्याची अधिसूचना काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:06 IST

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : न्यायालयीन प्रक्रियेत अडकली गावे; अद्यापही ग्रामस्थांचा विरोध कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई तालुक्यातील ३५ गावे आणि वसई, नालासोपारा, नवघर-माणिकपूर व विरार अशा चार नगरपरिषद मिळून वसई-विरार शहर महापालिकेची स्थापना केली. मात्र ३५ गावांचा महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध होता. आजही हा विरोध कायम आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली ही गावे मुक्त करण्यासाठी शासनाने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

वसई-विरार शहर महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता पुन्हा एकदा गावे वगळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. सरकारने अधिसूचना काढून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली ही गावे मुक्त करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती मी वसईकर अभियानाचे मिलिंद खानोलकर यांनी लोकमतला दिली.

खानोलकर यांनी सांगितले की, सुरुवातीला २९ गावे वसई-विरार महापालिकेतून वगळण्याकरिता माजी आ. विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली झालेली वसईकरांची उत्स्फूर्त आंदोलने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहीत आहेत. त्या अभूतपूर्व लढ्याला उद्धव ठाकरे यांनी स्वत: वसईत येऊन जाहीर समर्थनही दिले होते. त्या वेळेस विरोधी पक्षात असलेली शिवसेना व भाजप यांनी वसईकरांच्या इच्छेचा आदर लोकशाहीत सरकारने केला पाहिजे असे दोन्ही पक्षांचे विधिमंडळ सदस्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तत्कालीन सरकारला सांगत होते, मात्र आंदोलनात सातत्य आणि विधिमंडळात सर्वांचा मिळालेला पाठिंबा याच्या एकत्रित परिणामाने तत्कालीन आघाडी सरकारने २९ गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेऊन वसईकर जनतेच्या इच्छेचा आदर केला होता. दरम्यान, या निर्णयाविरुद्ध महापालिकेचे तत्कालीन महापौर राजीव पाटील यांनी आयुक्तांचे अधिकार वापरून मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि त्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली व ती आजपर्यंत कायम आहे. गेली सहा ते सात वर्ष सुनावणी न होता, तारखा मिळण्याव्यतिरिक्त निकालाच्या दिशेने कोणतीही विशेष प्रगती झाली नाही.

फाइल नगरविकासमंत्र्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत?शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. दि. १२ मार्च २०२० रोजी तत्कालीन पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी त्यांच्याकडे वसई-विरार महापालिका प्रशासनाचा पदभार असताना गावे वगळण्याच्या व जैसे थे आदेशाबाबत याचिका आयुक्तांनी दाखल केलेली नाही. त्यामुळे वेगळा अभिप्राय नाही, असे पत्र प्रधान सचिवांना दिले आहे. ती फाइल सध्या एकनाथ शिंदे यांच्या टेबलवर स्वाक्षरीसाठी प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आता गावे वगळण्याची ही फाइल मुख्यमंत्र्यांच्या दारापर्यंत कधी जाते व मुख्यमंत्री ठाकरे याबाबत नेमका कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.